Weather Alert: राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता, 31 जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Alert: 21 जुलै रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून लक्षात येत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
advertisement
कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्या भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनावश्यक प्रवास टाळावा, घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.