Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं तुफान, बुधवारी 19 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी पुन्हा 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. मुंबई, कोकणसह मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं. पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 17 सप्टेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पावसासह अंशतः ढगाळ आकाश राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 अंश आणि 24 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांना बुधवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विदर्भ आणि तेलंगाना सीमेवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.