Tulsi puja: तुळशीला जल अर्पण करताना 11 वेळा म्हणायचा हा मंत्र; घरातील सुख-समृद्धी राहते अबाधित

Last Updated:
Tulsi Puja Tips Marathi : आपल्याला सुख-समृद्धी, यश, पैसा मिळावा, घरात शांतता राहावी, असं प्रत्येकाला वाटतं. कुटुंबात सुख-शांती असल्यास जीवन आनंदी राहतं. यासाठी काही जण आध्यात्मिक, ज्योतिष किंवा वास्तुशास्त्रानुसार उपाययोजना करतात. हिंदू धर्मात तुळशीला विशेष स्थान आहे. नियमितपणे तुळशीची आराधना केली तर घरात धनवृद्धी होते असं मानलं जातं.
1/5
ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात सुख-समृद्धी वास करते, असं ज्योतिष जाणकार सांगतात. तुम्ही आर्थिक टंचाईचा सामना करत असलात, तर तुळशीसंदर्भातले काही उपाय नक्की करून पाहा. हे उपाय नियमित केले तर तुमच्या घरात कधीच दारिद्र्य येणार नाही. तसंच घरात कायम सकारात्मकता राहील. हे उपाय कोणते आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ या. 
ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात सुख-समृद्धी वास करते, असं ज्योतिष जाणकार सांगतात. तुम्ही आर्थिक टंचाईचा सामना करत असलात, तर तुळशीसंदर्भातले काही उपाय नक्की करून पाहा. हे उपाय नियमित केले तर तुमच्या घरात कधीच दारिद्र्य येणार नाही. तसंच घरात कायम सकारात्मकता राहील. हे उपाय कोणते आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ या. 
advertisement
2/5
हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. धर्मशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाजवळ भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीमातेचा वास असतो. भगवान विष्णूला तुळस विशेष प्रिय आहे. त्यामुळे विष्णू-लक्ष्मीच्या पूजेत तुळशीला विशेष महत्त्व आहे.
हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. धर्मशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाजवळ भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीमातेचा वास असतो. भगवान विष्णूला तुळस विशेष प्रिय आहे. त्यामुळे विष्णू-लक्ष्मीच्या पूजेत तुळशीला विशेष महत्त्व आहे.
advertisement
3/5
त्यामुळे ज्या घरात तुळस असते, त्या घरावर श्रीहरी आणि लक्ष्मीमातेची विशेष कृपा असते. तुळशीमुळे घरातलं वातावरण सकारात्मक राहतं. तुळशीच्या रोपाला नियमित एक वस्तू अर्पण केली, तर संबंधित व्यक्तीला कधीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. त्याच्यावर लक्ष्मीमातेची विशेष कृपा राहते.
त्यामुळे ज्या घरात तुळस असते, त्या घरावर श्रीहरी आणि लक्ष्मीमातेची विशेष कृपा असते. तुळशीमुळे घरातलं वातावरण सकारात्मक राहतं. तुळशीच्या रोपाला नियमित एक वस्तू अर्पण केली, तर संबंधित व्यक्तीला कधीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. त्याच्यावर लक्ष्मीमातेची विशेष कृपा राहते.
advertisement
4/5
जर एखादी व्यक्ती पापाच्या ओझ्याखाली असेल तर त्या व्यक्तीने नियमित तुळशीला पाणी घातलं पाहिजे. यामुळे त्याची सर्व पापं नष्ट होतात. अशी व्यक्ती पापमुक्त होते. जी व्यक्ती तुळशीला रोज पाणी अर्पण करते, त्या व्यक्तीच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
जर एखादी व्यक्ती पापाच्या ओझ्याखाली असेल तर त्या व्यक्तीने नियमित तुळशीला पाणी घातलं पाहिजे. यामुळे त्याची सर्व पापं नष्ट होतात. अशी व्यक्ती पापमुक्त होते. जी व्यक्ती तुळशीला रोज पाणी अर्पण करते, त्या व्यक्तीच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
advertisement
5/5
ज्योतिष अभ्यासकांच्या मते, तुळशीला जल अर्पण करताना ॐ सुभद्राय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि लक्ष्मीमातेची विशेष कृपादृष्टी प्राप्त होते. धर्मशास्त्रानुसार, तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. जे तुळशीची मनोभावे पूजा करतात, त्यांच्या घरात कधीच दारिद्रय येत नाही, असं मानलं जातं. त्यामुळे घरात सुख-समृद्धी,पैसा राहावा यासाठी नियमित तुळशीची उपासना गरजेची आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
ज्योतिष अभ्यासकांच्या मते, तुळशीला जल अर्पण करताना ॐ सुभद्राय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि लक्ष्मीमातेची विशेष कृपादृष्टी प्राप्त होते. धर्मशास्त्रानुसार, तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. जे तुळशीची मनोभावे पूजा करतात, त्यांच्या घरात कधीच दारिद्रय येत नाही, असं मानलं जातं. त्यामुळे घरात सुख-समृद्धी,पैसा राहावा यासाठी नियमित तुळशीची उपासना गरजेची आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement