उद्या संकष्टी चतुर्थी! उपवास ठेवत असाल तर करू नका चूक, 'हा' एक पदार्थ खाणं टाळाच
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या फाल्गुन महिन्यातील 'संकष्टी चतुर्थी' साजरी केली जाणार आहे. गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र असून, अनेकजण या दिवशी मनोभावे उपवास धरतात. संकष्टीचा उपवास हा केवळ श्रद्धेचा भाग नसून तो शिस्तीचाही भाग आहे.
उद्या फाल्गुन महिन्यातील 'संकष्टी चतुर्थी' साजरी केली जाणार आहे. गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र असून, अनेकजण या दिवशी मनोभावे उपवास धरतात. संकष्टीचा उपवास हा केवळ श्रद्धेचा भाग नसून तो शिस्तीचाही भाग आहे. शास्त्रानुसार, उपवास करताना आपण काय खातो यापेक्षा काय टाळतो, याला अधिक महत्त्व आहे.
advertisement
advertisement
कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य: अनेकदा आपण उपवास करतो आणि कळत न कळत आपण उपवास सोडताना असे काही पदार्थ खातो ज्यामुळे दिवसभराच्या उपवासाचे फळ वाया जाते. उपवासाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये चुकूनही कांदा आणि लसूण वापरू नका. अनेकजण साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याची भाजी करताना चवीसाठी हे पदार्थ वापरतात, परंतु शास्त्रांनुसार कांदा-लसूण हे 'तामसिक' अन्न मानले जाते. उपवासाच्या दिवशी सात्त्विक आहार घेणेच बंधनकारक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अन्न वाया घालवू नका: उपवासाच्या दिवशी फलाहार करताना किंवा रात्री जेवताना ताटात अन्न उरवू नका. अन्नाचा अपमान करणे म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे. जेवढे आवश्यक आहे तेवढेच ताटात घ्यावे. गरिबांना किंवा गरजूला दान करणे या दिवशी अधिक पुण्यदायी ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)






