रावणाला 'अहंकार' नडला, वरदानात सर्व काही मागितलं, पण 'त्या' एका चुकीने झाला वध
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
रामायण ही केवळ एक कथा नसून तो मानवी स्वभावाचा आणि कर्माचा आरसा आहे. यात लंकेश रावणाचे पात्र अत्यंत गुंतागुंतीचे आणि शिकवण देणारे आहे. रावण हा प्रकांड पंडित, दशग्रंथी ब्राह्मण आणि भगवान शिवशंकराचा परमभक्त होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अहंकार नडला आणि चूक घडली: रावणाने मानवाचा केलेला हा अपमानच त्याच्या वधाचे मुख्य कारण ठरला. सृष्टीच्या नियमानुसार, ज्याचा त्याने त्याग केला होता, त्याच रूपाने त्याचा अंत होणे निश्चित होते. त्यामुळेच भगवान विष्णूंनी 'राम' या मानवी रूपात अवतार घेतला, ज्याचा वध करण्यासाठी रावणाकडे कोणतेही सुरक्षा कवच नव्हते.
advertisement
advertisement
विभीषणाचा सल्ला नाकारला: ज्ञानी असूनही रावण 'मोहा'त अडकला होता. त्याचा भाऊ विभीषण याने त्याला वारंवार समजावले की, राम हे सामान्य मनुष्य नसून साक्षात ईश्वराचा अंश आहेत. पण अहंकाराने अंध झालेल्या रावणाने आपल्याच भावाचा अपमान करून त्याला लंकेतून हाकलून दिले, जी त्याची दुसरी मोठी चूक ठरली. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








