उद्या विजया एकादशी! चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, 99% लोक पहिला पदार्थ चवीने खातात
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या, 13 फेब्रुवारी 2026 रोजी 'विजया एकादशी' साजरी केली जाणार आहे. शास्त्रानुसार, एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम मानले जाते. विजया एकादशी ही कार्यसिद्धी आणि विजयाचे वरदान देणारी आहे. मात्र, या दिवशी अन्नाबाबत अतिशय कडक नियम पाळणे आवश्यक असते.
advertisement
advertisement
भात किंवा तांदूळ: एकादशीला तांदूळ खाणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते. पौराणिक कथेनुसार, महर्षी मेधा यांच्या शरीराचा अंश पृथ्वीवर पडला आणि त्यातून तांदूळ उत्पन्न झाले. म्हणून एकादशीला भात खाणे म्हणजे प्राण्यांच्या मांसाचे सेवन करण्यासारखे मानले जाते. या दिवशी भात खाल्ल्याने पुढचा जन्म सरपटणाऱ्या प्राण्यांच्या योनीत मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
advertisement
advertisement
कांदा, लसूण: कांदा हा 'तामसिक' आहार मानला जातो. कांदा खाल्ल्याने मनात कामवासना आणि राग वाढतो. एकादशी ही विष्णूंच्या भक्तीचा दिवस असल्याने मनातील सात्विकता टिकवण्यासाठी कांदा खाऊ नये. लसणाचा संबंध राहू-केतूशी जोडला जातो. जरी लसूण आरोग्यासाठी चांगला असला, तरी आध्यात्मिक कार्यामध्ये तो अपवित्र मानला जातो. लसणाच्या सेवनामुळे देवाच्या नामस्मरणात मन लागत नाही, म्हणूनच एकादशीच्या जेवणात लसणाचा वापर करू नये.
advertisement
इतर तामसिक पदार्थ आणि मांस-मदिरा: एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांस, मासे किंवा मद्यपान करणे हे महापाप आहे. तसेच मसूर डाळ आणि मध यांचे सेवन देखील या दिवशी टाळावे, कारण ते रक्तातील उष्णता वाढवतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








