तुळशीचं लग्न म्हणजे सुखाची नांदी! संसार होऊ शकतो मनासारखा, हलू शकतो पाळणा, करा खास उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Tulsi Vivah 2024: सर्वत्र सकारात्मक, प्रसन्न वातावरण निर्माण करणाऱ्या दिवाळी सणाची सांगता खऱ्या अर्थानं तुळशी विवाहाला होते. तुळशीचं लग्न ही शुभकार्यांची नांदी मानली जाते. म्हणूनच अत्यंत शुभ दिवसांपैकी एक असल्यामुळे या दिवशी म्हणजेच तुळशी विवाहाच्या दिवशी सुखी आयुष्यासाठी काही खास उपाय करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. हे उपाय नेमके कोणते आहेत, पाहूया. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
advertisement
अखंड सौभाग्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी देवीचं भगवान शालिग्राम (भगवान विष्णूंचं रूप) यांच्याशी विधीवत लग्न लावावं. लग्नासाठी तुळशीला सोळा शृंगारांनी सजवावं. यामुळे देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदू लागते. तसंच घरात लवकरच पाळणा हलतो, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement