घरात भांडणाचं कारण बनतात 'या' गोष्टी, आजच करा चेंज; अन्यथा वाढतील सुखी संसारात अडचणी!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेकदा मेहनतीने कमावलेला पैसा असूनही घरात शांती लाभत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरातील सदस्यांमध्ये मोठे वाद होतात आणि विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरातील ऊर्जेचा आपल्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो.
अनेकदा मेहनतीने कमावलेला पैसा असूनही घरात शांती लाभत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरातील सदस्यांमध्ये मोठे वाद होतात आणि विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरातील ऊर्जेचा आपल्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो. जर तुमच्याही घरात सतत भांडणे होत असतील, तर त्याचे मुख्य कारण तुमच्या घरात असलेल्या काही चुकीच्या वस्तू असू शकतात.
advertisement
advertisement
बेडरूममधील आरसा: अनेकजण सजावटीसाठी बेडरूममध्ये मोठा आरसा लावतात, पण त्याचे स्थान चुकीचे असल्यास ते नात्यात दुरावा आणते. जर झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशात दिसत असेल, तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात. शक्य असल्यास आरसा बेडच्या समोरून हटवावा किंवा रात्री झोपताना तो कापडाने झाकून ठेवावा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घरात काटेरी झाडे लावणे: घरात किंवा खिडकीत निवडुंग किंवा इतर काटेरी झाडे लावणे टाळावे. काटेरी झाडे नकारात्मकता वाढवतात आणि नात्यात कटुता निर्माण करतात. त्याऐवजी तुळस किंवा मनीप्लांट यांसारखी शुभ झाडे लावावीत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








