तुम्हीही अलार्मशिवाय लवकर उठता का? तर निसर्ग तुम्हाला देतोय खास संदेश, ज्योतिष सांगतात की...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
सतत पहाटे 3 ते 4 या वेळेत जाग येत असेल, तर ती चिंता करण्यासारखी बाब नाही. ज्योतिषाचार्य संतोष कुमार यांच्या मते ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची असून, यावेळी निसर्ग आपल्याला काही संकेत देतो. जर...
बहुतेकांनी कोणतीही गजर किंवा सूचना नसतानाही अगदी पहाटे, म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर आपोआप जाग येते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. ज्योतिषी संतोष कुमार सांगतात की, जर तुम्हाला पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान जाग येत असेल, तर तुम्ही हे समजून घ्या की निसर्ग तुम्हाला काहीतरी संदेश देत आहे. या वेळेचा तुम्ही पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. कारण या वेळेत वातावरणात खूप सकारात्मक ऊर्जा असते. या ऊर्जेचा उपयोग तुम्ही आपले आयुष्य सुधारण्यासाठी करू शकता.
advertisement
जर तुम्ही या वेळेत उठत असाल, तर उठून आपल्या आराध्य दैवताची प्रार्थना करा. किंवा तुमचे दैवत तुम्हाला काही मार्ग दाखवत असेल, तर या वेळेचा उपयोग करा. यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. तुम्हाला जर काहीच सुचत नसेल, तर तुम्ही शांत बसून आपल्या आवडत्या देवाचे नामस्मरण करू शकता, हे देखील तितकेच प्रभावी आहे, असे ज्योतिषींनी सुचवले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बऱ्याच लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो, म्हणजे त्यांना झोपच लागत नाही. जर तुम्हाला नेहमीच असं होत असेल, तर मग तुम्ही तुमच्या शरीराची तपासणी करून पाहू शकता, तुम्हाला काही शारीरिक समस्या आहे का? संतोष कुमार म्हणतात की, जर अशा कोणत्याही समस्यांशिवाय तुम्हाला जाग येत असेल, तर समजून घ्या की निसर्गाला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे.