हिंदू धर्मात मृत्यूनंतर 10 दिवस का लावतात दिवा? ज्योत विझली तर काय होतं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस तिच्या नावे पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे घरी धान्याच्या गोलाकार पिठावर एक पणती दहा दिवस ठेवतात. त्या दिव्याशेजारी पहिल्या दिवशी पाण्याचे एक पात्र तर दुसऱ्या दिवसापासून भोजनाच्या वेळी भाताचा पिंड वा दुधाची वाटीही ठेवली जाते. असे मानले जाते की दहा दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या अवयवश्राद्धांनी लिंगदेहाची परिपूर्ती होते.
advertisement
advertisement
advertisement
सर्वदूर असा समज आहे की, त्या दिव्याखाली असणाऱ्या पिठावर मृत व्यक्तीला पुढे कोणता जन्म मिळाला असेल, त्याची पावले उमटतात. ही समजूत चुकीची आहे. कारण पणतीखाली पिठावर उमटलेली आकृती पणतीच्या खडबडीत तळामुळे तयार झालेली असते. त्या आकृतीचा परलोकाशी वा पुनर्जन्माशी काहीच संबंध नसतो, असे कृष्णात गुरव सांगतात.
advertisement
advertisement


