India vs Pakistan : भारत 8, पाकिस्तान 1; SKYच्या हुशारीने PAKचे सरेंडर, पहिल्या बॉलआधीच टीम इंडियाचा विजय कसा ठरला!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे बहिष्काराच्या नाट्यानंतर भारताने हा सामना जिंकून पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली आहे.
advertisement
भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक 40 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत. त्याच्यासोबच सूर्यकुमार यादवने 32 धावांची खेळी केली होती. त्यानंतर शेवटच्या क्षणी शिवम दुबने 17 बॉल 28 आणि रिंकूने 4 बॉल 11 धावा केल्या. या बळावर भारताने 175 धावा केल्या होत्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पावरप्लेमध्ये पाकिस्तानने 4 विकेट गमावून 38 धावा केल्या होत्या. त्यानंतर उस्मान खानने पाकिस्तानचा डाव सावरल होता. तो एकटाच होता जो पाकिस्तानकडून चांगली फलंदाजी करत होता. या दरम्यान अक्षर पटेलच्या बॉलवर उस्मान खान स्टम्प आऊट झाला. उस्मान खान 44 वर बाद झाला. पाकिस्तानकडून एका खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या.
advertisement
advertisement
पाकिस्तान या बळावर 20 ओव्हरमध्ये 114 च धावा करू शकला त्यामुळे भारताने हा सामना 61 धावांनी जिंकला आहे. कॅप्टन सूर्याच्या हुशारीने भारताने हा सामना जिंकला आहे. कारण त्याला प्रथम फलंदाजी करायची होती. त्यानुसार त्याने फलंदाजी केली. संयमाने तो मैदानावर खेळला.त्यानंतर त्याने गोलंदाजांचाही चांगला वापर करून पाकिस्तानला एकामागून एक धक्के दिले. त्यामुळे सूर्याच्या या रणनितीमुळे भारताने हा सामना जिंकला आहे.










