advertisement

T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-इंग्लंड पाचव्यांदा भिडणार, इतिहास कुणाच्या बाजूने? टेन्शन वाढवणारे आकडे!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. वेस्ट इंडिजचा पराभव करून टीम इंडिया आणखी एका टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचली आहे.
1/9
भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवार 5 मार्चला वानखेडे स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मैदानात उतरेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवार 5 मार्चला वानखेडे स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मैदानात उतरेल.
advertisement
2/9
मागच्या दोन्ही टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने-सामने होते, आता लागोपाठ तिसऱ्यांदा या दोन्ही टीम पुन्हा एकदा सेमी फायनलमध्येच भिडणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, ज्यात 2 सेमी फायनलचा समावेश आहे.
मागच्या दोन्ही टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने-सामने होते, आता लागोपाठ तिसऱ्यांदा या दोन्ही टीम पुन्हा एकदा सेमी फायनलमध्येच भिडणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, ज्यात 2 सेमी फायनलचा समावेश आहे.
advertisement
3/9
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा पहिला सामना 2007 साली झाला होता, ज्यात युवराज सिंगने 6 बॉल 6 सिक्स मारल्या होत्या. भारताने या सामन्यात 218/4 एवढा स्कोअर केला, या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 200/6 पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे भारताचा 18 रननी विजय झाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा पहिला सामना 2007 साली झाला होता, ज्यात युवराज सिंगने 6 बॉल 6 सिक्स मारल्या होत्या. भारताने या सामन्यात 218/4 एवढा स्कोअर केला, या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 200/6 पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे भारताचा 18 रननी विजय झाला.
advertisement
4/9
2009 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पहिल्या पराभवाचा बदला घेतला. इंग्लंडने 153/7 एवढा स्कोअर केला, याचा पाठलाग करताना भारताला 150/5 पर्यंतच मजल मारता आली. युसूफ पठाणने 17 बॉलमध्ये 3 फोरसह 33 रनची नाबाद खेळी केली.
2009 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पहिल्या पराभवाचा बदला घेतला. इंग्लंडने 153/7 एवढा स्कोअर केला, याचा पाठलाग करताना भारताला 150/5 पर्यंतच मजल मारता आली. युसूफ पठाणने 17 बॉलमध्ये 3 फोरसह 33 रनची नाबाद खेळी केली.
advertisement
5/9
यानंतर 2012 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत-इंग्लंड यांच्यात ग्रुप स्टेजची मॅच झाली. गौतम गंभीरच्या 45 आणि रोहित शर्माच्या नाबाद 55 रनमुळे भारताने 170/4 एवढा स्कोअर केला. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा फक्त 80 रनवर ऑलआऊट झाला.
यानंतर 2012 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत-इंग्लंड यांच्यात ग्रुप स्टेजची मॅच झाली. गौतम गंभीरच्या 45 आणि रोहित शर्माच्या नाबाद 55 रनमुळे भारताने 170/4 एवढा स्कोअर केला. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा फक्त 80 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
6/9
भारत आणि इंग्लंड यांच्यात यानंतर 10 वर्षांनी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलचा सामना झाला, ज्यात इंग्लंडने तब्बल 10 विकेटने विजय मिळवला. भारताने पहिले बॅटिंग करताना 168/6 एवढा स्कोअर केला. जॉस बटलर नाबाद 80 आणि एलेक्स हेल्स नाबाद 86 या दोन ओपनरनी 16 ओव्हरमध्येच इंग्लंडला जिंकवलं.
भारत आणि इंग्लंड यांच्यात यानंतर 10 वर्षांनी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलचा सामना झाला, ज्यात इंग्लंडने तब्बल 10 विकेटने विजय मिळवला. भारताने पहिले बॅटिंग करताना 168/6 एवढा स्कोअर केला. जॉस बटलर नाबाद 80 आणि एलेक्स हेल्स नाबाद 86 या दोन ओपनरनी 16 ओव्हरमध्येच इंग्लंडला जिंकवलं.
advertisement
7/9
टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने या पराभवाचा बदला घेतला आणि 68 रननी विजय मिळवला. पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने 171/7 केले, याचा पाठलाग करताना इंग्लंडचा 103 रनवर ऑलआऊट झाला.
टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने या पराभवाचा बदला घेतला आणि 68 रननी विजय मिळवला. पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने 171/7 केले, याचा पाठलाग करताना इंग्लंडचा 103 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
8/9
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 5 मॅच झाल्या यातल्या 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर इंग्लंडने 2 मॅच जिंकल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 5 मॅच झाल्या यातल्या 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर इंग्लंडने 2 मॅच जिंकल्या आहेत.
advertisement
9/9
वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात 2 सामने झाले आहेत. 2012 साली झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 6 विकेटने विजय झाला, तर 13 वर्षांनंतर 2025 साली पुन्हा एकदा याच मैदानात दोन्ही टीम आमने-सामने आल्या, तेव्हा भारताने 150 रननी दणदणीत विजय मिळवला.
वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात 2 सामने झाले आहेत. 2012 साली झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 6 विकेटने विजय झाला, तर 13 वर्षांनंतर 2025 साली पुन्हा एकदा याच मैदानात दोन्ही टीम आमने-सामने आल्या, तेव्हा भारताने 150 रननी दणदणीत विजय मिळवला.
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement