Jain Monk Lifestyle : जैन साधू-साध्वी कधीच करत नाहीत अंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
जैन धर्मात साधू आणि साध्वी कठोर आणि शिस्तबद्ध जीवन जगतात. दीक्षा घेतल्यानंतर ते कधीही स्नान करत नाही. तरीही तुम्ही त्यांना नेहमी स्वच्छ आणि ताजंतवानं पाहाल.
advertisement
जैन पंथातील साध्वी साडीच्या रूपात पांढरे वस्त्र परिधान करतात. प्रचंड थंडीतही ते असेच कपडे घालतात. पण दिगंबर साधू कपडेही घालत नाहीत, बर्फाळ थंडीतही कोणत्याही परिस्थितीत कपडे घालत नाहीत. श्वेतांबर साधू आणि साध्वी देखील त्यांच्याजवळ ठेवलेल्या 14 वस्तूंपैकी एक घोंगडी ठेवतात, जी खूप पातळ असते, ते ती झोपतानाच घेतात.
advertisement
advertisement
advertisement
मग ते स्वच्छ कसे राहतात. माहितीनुसार त्यांची अंघोळ मुख्यतः दोन प्रकारची असते - बाह्य आणि अंतर्गत. सामान्य लोक पाण्याने आंघोळ करतात. परंतु जैन साधू-साध्वी आंतरिक स्नान करतात, म्हणजे ध्यानात बसून, मन आणि विचार शुद्ध करतात. त्यांच्यासाठी अंघोळ करणं म्हणजे भावनांचं शुद्धीकरण. त्याचं पालन ते आयुष्यभर करतात.
advertisement