advertisement

Weather Alert : पुढील 24 महत्त्वाचे, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, पाहा हवामानाचा अंदाज

Last Updated:

राज्यातील सोलापूर, लातूर, नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 26 एप्रिल रोजी आहे. तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

+
News18

News18

पुणे : राज्यामध्ये एकीकडे तीव्र उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सोलापूर, लातूर, नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 26 एप्रिल रोजी आहे. तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
advertisement
उष्णतेच्या कडाक्याने लाहीलाही झाल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
तर मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली मध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
तर विदर्भामध्ये कडाक्याची उष्णता तसेच काही भागांमध्ये पावसाचे आगमन होऊ शकतं. विदर्भातील अकोलाला उष्णतेसाठी अलर्ट दिला आहे व नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्ण व दमट हवामान पाहायला मिळणार असून त्याचबरोबर पावसाच्या सरी देखील कोसळू शकतात. मुख्यत्वे सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. तर राज्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Alert : पुढील 24 महत्त्वाचे, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, पाहा हवामानाचा अंदाज
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement