advertisement

आयटीयन्ससाठी गूड न्यूज! पुणे-मुंबई प्रवासात एक तास वाचणार, त्या मागणीला अखेर यश

Last Updated:

पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

आयटीयन्ससाठी गूड न्यूज (फाईल फोटो)
आयटीयन्ससाठी गूड न्यूज (फाईल फोटो)
पुणे: पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पुणे शहरातील प्रचंड वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी आता हिंजवडी येथून थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा किमान एक तास वेळ वाचणार असून, प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
वाहतूक कोंडीचा अडथळा दूर होणार
सध्या स्वारगेट, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या शिवनेरी आणि शिवाई बसला वाकड चौकातून शहरात शिरताना आणि बाहेर पडताना दीड ते दोन तासांचा विलंब होतो. हिंजवडीतून थेट बस सुरू झाल्यामुळे प्रवाशांना आता स्वारगेटला जाण्याची गरज उरणार नाही. पर्यायाने, शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीचा फटका न बसता बस थेट हायवेला लागेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
advertisement
प्रवाशांना मिळणारे फायदे:
पुणे शहरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना होणारा १ ते १.५ तासांचा विलंब पूर्णपणे टळणार आहे.
मेट्रो कनेक्टिव्हिटी: आगामी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ मुळे प्रवाशांना हिंजवडीतील एसटी बस स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
ई-बस सुविधेवर भर: हिंजवडीतच बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे ई-शिवनेरी आणि ई-शिवाई बसेसची उपलब्धता वाढेल.
advertisement
थेट कनेक्टिव्हिटी: हिंजवडीतील आयटी प्रोफेशनलना घरून किंवा ऑफिसवरून थेट मुंबई गाठणे सुलभ होईल.
प्रशासनाची तयारी
एसटी प्रशासनाने या सेवेचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवला असून, लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पुणे विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले की, प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पुढील काही महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. हिंजवडीतून दादर, बोरीवली आणि ठाणे या मार्गावर बस फेऱ्या सुरू होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आयटीयन्ससाठी गूड न्यूज! पुणे-मुंबई प्रवासात एक तास वाचणार, त्या मागणीला अखेर यश
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement