advertisement

पुणे हादरलं! नळ जोडण्यावरून वाद, चौघांनी पकडून ठेवलं अन् एकाने कोयत्याने सपासप गळा चिरला, विजेंद्रचा जागीच मृत्यू

Last Updated:

आरोपींनी विजेंद्रला पकडून ठेवले आणि मुख्य आरोपी दिनेश भोसले याने हातात असलेल्या कोयत्याने विजेंद्रच्या गळ्यावर जोरदार वार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने विजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.

विजेंद्र भोसले या व्यक्तीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली (प्रतिकात्मक फोटो)
विजेंद्र भोसले या व्यक्तीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे जिल्ह्यातून पुन्हा एकदा हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात केवळ नळाच्या कनेक्शनवरून झालेल्या वादाचं रुपांतर भीषण रक्तरंजित संघर्षात झालं आहे. दौंड तालुक्यातील राजेगाव येथे सोमवारी (३० मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. यात विजेंद्र भोसले (वय ३८) या व्यक्तीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात विजेंद्रचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी आणि सायंकाळी नळ जोडणीच्या कारणावरून दोन गटांत शाब्दिक चकमक झाली होती. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. आरोपींनी विजेंद्र भोसले यांच्या घराबाहेर येऊन त्यांना गाठले. आरोपींनी विजेंद्रला पकडून ठेवले आणि मुख्य आरोपी दिनेश भोसले याने हातात असलेल्या कोयत्याने विजेंद्रच्या गळ्यावर जोरदार वार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने विजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
या भीषण हल्ल्यात स्वरूप भोसले, आदेश भोसले आणि ऋषिकेश भोसले हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत जनार्दन भोसले आणि महेश भोसले या दोघांना अटक केली आहे. मात्र, घटनेनंतर दिनेश भोसले, योगेश भोसले, राज भोसले आणि नीलेश भोसले हे चौघे फरार झाले आहेत. फरार आरोपींबद्दल महत्त्वाची माहिती हाती लागली असून पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
advertisement
गावातील किरकोळ वादाचे रूपांतर अशा भीषण हत्येत झाल्याने राजेगाव परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! नळ जोडण्यावरून वाद, चौघांनी पकडून ठेवलं अन् एकाने कोयत्याने सपासप गळा चिरला, विजेंद्रचा जागीच मृत्यू
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement