पैशांची चणचण दूर होईल! वैशाख पौर्णिमेला 'या' 4 ठिकाणी लावा दिवा, घरात नांदेल सुख-समृद्धी
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
12 मे 2025 रोजी वैसाख पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी लक्ष्मी-नारायण किंवा भगवान शिवाची पूजा, अर्घ्य अर्पण आणि उपवास केल्याने कर्ज, दरिद्रता आणि...
तुम्ही जर खूप दिवसांपासून कर्जाच्या बोजाखाली असाल किंवा पैशांच्या अडचणी तुमचा पिच्छा सोडत नसतील, तर वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी एक खास संधी आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. असं मानलं जातं की, या दिवशी काही विशेष उपाय केल्यास केवळ पापांचा नाश होत नाही, तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देखील येते.
वैशाख पौर्णिमा का आहे खास?
देवघर येथील मुद्गल ज्योतिष केंद्राचे ज्योतिषी, पंडित नंदकिशोर मुद्गल यांच्या मते, वैशाख महिन्यातील पौर्णिमा खूप चांगले फळ देणारा दिवस आहे. या वर्षी ही तिथी 12 मे 2025 रोजी येत आहे. या दिवशी स्नान, दान आणि लक्ष्मीनारायण किंवा भगवान शंकराची पूजा करणे विशेष लाभदायक मानले जाते.
पं. मुद्गल सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या मनाने या दिवशी व्रत ठेवले, पूजा केली आणि संध्याकाळी विशेष ठिकाणी दिवा लावला, तर जीवनात सुरू असलेल्या आर्थिक अडचणी हळूहळू संपुष्टात येतात.
advertisement
जर तुमच्या घरात धनसंपत्ती यावी, कर्जातून मुक्ती मिळावी आणि रोजच्या आर्थिक समस्यांपासून आराम मिळावा असे वाटत असेल, तर तुम्ही या चार ठिकाणी दिवा लावावा...
- मुख्य दरवाजा : प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते.
- तुळशीचे रोप : तुळशीजवळ दिवा लावल्याने कुटुंबात शांती टिकून राहते आणि घरात आरोग्य व समृद्धी कायम राहते.
- पूजा घर : घरातील देव्हाऱ्यात दिवा लावा आणि लक्ष्मीनारायण किंवा भगवान शंकराची पूजा करा. यामुळे आशीर्वाद मिळतात.
- स्वयंपाकघर : स्वयंपाकघरात दिवा लावल्याने धान्याची कधीच कमतरता भासत नाही आणि घरात अन्नपूर्णेचा वास राहतो.
advertisement
अर्घ्य देणे आणि उपवास करणे देखील खूप फायदेशीर
या दिवशी चंद्राला अर्घ्य देणे देखील शुभ मानले जाते. पाण्यात दूध आणि पांढरे चंदन मिसळून चंद्राला अर्घ्य दिल्याने मानसिक शांती मिळते आणि आरोग्यासाठीही फायदा होतो. तसेच, शक्य असल्यास, दिवसभर उपवास ठेवा आणि फक्त संध्याकाळी भोजन करा.
हे ही वाचा : दहशतवादाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट! 'या' प्रसिद्ध पिकाची निर्यात थांबवली, पाकिस्तानला मोठा झटका!
advertisement
हे ही वाचा : तुम्हीही अलार्मशिवाय लवकर उठता का? तर निसर्ग तुम्हाला देतोय खास संदेश, ज्योतिष सांगतात की...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
पैशांची चणचण दूर होईल! वैशाख पौर्णिमेला 'या' 4 ठिकाणी लावा दिवा, घरात नांदेल सुख-समृद्धी