Mahabharat : दुर्योधनाचं तो शब्द ठरला कौरवांच्या अपयशाचं कारण, वाचले पांडवांचे प्राण

Last Updated:

Mahabharat Story : महायुद्धात अनेक कथा लपलेल्या आहेत, त्यापैकी एक अर्जुन आणि दुर्योधनाची आहे. साधारणपणे दोघांनाही एकमेकांचे शत्रू मानलं जातं, पण एक वेळ अशी आली जेव्हा अर्जुनने दुर्योधनाकडे असं काहीतरी मागितलं ज्यामुळे सर्व पांडवांचे प्राण वाचले.

News18
News18
महाभारत हे फक्त एक युद्ध नव्हतं, तर ते मानवी स्वभावाचा, त्याच्या विचारसरणीचा आणि धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाचा आरसा होता. या महायुद्धात अनेक कथा लपलेल्या आहेत, त्यापैकी एक अर्जुन आणि दुर्योधनाची आहे. साधारणपणे दोघांनाही एकमेकांचे शत्रू मानलं जातं, पण एक वेळ अशी आली जेव्हा अर्जुनने दुर्योधनाकडे असं काहीतरी मागितलं ज्यामुळे सर्व पांडवांचे प्राण वाचले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुर्योधनाने ती गोष्ट आनंदाने त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूला दिली.
advertisement
कथा महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वीची आहे. पांडव त्यांच्या वनवासात एका तळ्याजवळ राहत होते. दुर्योधनही त्याच्या काही सैनिकांसह त्याच जंगलात पोहोचला. एके दिवशी तो तळ्यामध्ये स्नान करण्यासाठी गेला. त्यानंतर काही गंधर्व स्वर्गातून उतरले आणि स्नानावरून दुर्योधनाशी त्यांचा वाद झाला. प्रकरण वाढत गेलं आणि त्याचं रूपांतर युद्धात झाले. गंधर्वांनी दुर्योधनाचा पराभव केला आणि त्याला कैद करण्यात आलं.
advertisement
अर्जुनाने दुर्योधनाला मदत केली
जेव्हा पांडवांना कळलं की गंधर्वांनी दुर्योधनला कैद केलं आहे, तेव्हा युधिष्ठिरने अर्जुनला दुर्योधनला मुक्त करण्यासाठी पाठवलं. अर्जुनला वाटलं की शत्रू असूनही एखाद्याला मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्याने गंधर्वांशी युद्ध केलं आणि दुर्योधनला मुक्त केलं. हे पाहून दुर्योधन आश्चर्यचकित झाला आणि खूप प्रभावित झाला. त्याने अर्जुनला जे काही हवं ते मागण्यास सांगितलं. अर्जुनने नम्रपणे सांगितलं की वेळ आल्यावर तो वर मागेल.
advertisement
पाच बाणांचं रहस्य
महाभारत युद्धादरम्यान एक वेळ अशी आली जेव्हा दुर्योधनाला वाटलं की भीष्म पितामह पांडवांना अनुकूल आहेत. रागाच्या भरात त्याने भीष्म पितामह यांना सांगितलं की जर त्यांना हवं असेल तर ते एकाच दिवसात पांडवांना मारू शकतात. यावर भीष्मांनी पाच दिव्य बाण काढले आणि म्हणाले की दुसऱ्या दिवशी ते या बाणांनी पाचही पांडवांना मारतील. हे बाण पाहून भगवान श्रीकृष्णांना समजलं की आता धोका वाढला आहे. त्यांनी अर्जुनाला आठवण करून दिली की दुर्योधनाने आधीच एकदा वरदान दिलं होतं. हीच ती वेळ आहे जेव्हा त्या वरदानाचा वापर करता येईल.
advertisement
अर्जुनाने वर मागितला
त्याच रात्री अर्जुन दुर्योधनाच्या छावणीत गेला आणि त्याला वरदानाची आठवण करून दिली आणि पाच बाण मागितले. दुर्योधनला गोष्ट आठवली. थोडं आश्चर्यचकित होऊनही त्याने क्षत्रिय धर्माचं पालन केलं आणि अर्जुनाला बाण दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्योधनाने भीष्मांना नवीन बाण तयार करण्यास सांगितले, परंतु भीष्मांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी सांगितलं की एकदा दिलेलं वचन बदलता येत नाही.
advertisement
कौरवांच्या पराभवामागील हेच कारण
अशाप्रकारे अर्जुनाची बुद्धिमत्ता, श्रीकृष्णाची योजना आणि दुर्योधनाने दिलेला शब्द पाळल्याने पांडवांचे प्राण वाचले. या घटनेला महाभारतात एक टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जातं, जिथून कौरवांच्या पराभवाची सुरुवात झाली.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : दुर्योधनाचं तो शब्द ठरला कौरवांच्या अपयशाचं कारण, वाचले पांडवांचे प्राण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement