Mahabharat : महाभारताचं युद्ध फक्त 18 दिवसांतच का संपलं? काय आहेत यामागील कारणं?

Last Updated:

Mahabharat story : कुरुक्षेत्राच्या भूमीवर लढलेलं महाभारत युद्ध केवळ कौटुंबिक कलह नव्हतं तर धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य यांच्यातील युद्ध होतं. अनेकदा प्रश्न पडतो की इतकं भयंकर युद्ध फक्त 18 दिवसांत कसं संपलं?

News18
News18
नवी दिल्ली : आता जर तुम्ही युद्ध पाहिली तर ती कित्येक महिने चालतात. इतिहासातील युद्धांचा विचार केला तर महाभारत एकसुद्धा एक मोठं युद्ध होतं.  कुरुक्षेत्राच्या भूमीवर लढलेलं महाभारत युद्ध केवळ कौटुंबिक कलह नव्हतं तर धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य यांच्यातील युद्ध होतं. इतकं भयंकर युद्ध फक्त 18 दिवसांत संपलं.
महाभारत हा भारतीय इतिहासाचा एक अध्याय आहे जो स्वतःमध्ये अनेक रहस्ये दडवून ठेवतो. महाभारतासारखं मोठं युद्ध 18 दिवसांतच कसं संपलं? यामागे अनेक कारणे दिली आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
भीष्म पितामह यांना मिळाले वरदान : भीष्म पितामह यांना इच्छामृत्यूचं वरदान मिळालं होतं. त्यांनी पांडवांना त्यांच्या मृत्युचं रहस्य सांगितलं होतं, त्यानुसार जर शिखंडी त्यांच्यासमोर असेल तर ते शस्त्र उचलणार नाहीत. अर्जुनने ही युक्ती वापरली आणि भीष्मांवर बाण सोडले. त्यानंतर ते बाणांच्या शय्येवर पडले आणि युद्धाच्या दहाव्या दिवशी त्यांनी आपले प्राण सोडले. भीष्मांच्या पतनामुळे कौरव सैन्याचं मनोबल खचलं.
advertisement
युद्धाचे नियम : महाभारताच्या युद्धाचे काही नियम होते जे दोन्ही बाजूंना पाळावे लागत होते. सूर्यास्तानंतर युद्ध थांबवण्यात येत असे आणि सैन्य रात्री विश्रांती घेत असत. यामुळे युद्धाचा कालावधी मर्यादित झाला.
दोन्ही बाजूंचे शक्तिशाली सैन्य : कौरव आणि पांडव दोघांकडेही महारथी, योद्धे आणि शस्त्रे असलेले शक्तिशाली सैन्य होते. दोन्ही बाजूंमध्ये भयंकर युद्ध झाले ज्यामुळे अल्पावधीतच मोठे नुकसान झाले आणि युद्ध लवकर संपले.
advertisement
कृष्णाची रणनीती : भगवान श्रीकृष्णाने पांडवांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कूटनीतीद्वारे त्यांना विजयाकडे नेलं. त्यांच्या रणनीतींमुळे युद्धाचे स्वरूप बदललं आणि कौरवांचा पराभव झाला.
काळाचं चक्र : काही विद्वानांचा असा विश्वास आहे की महाभारत युद्ध एका विशिष्ट वेळेसाठी होणार होतं. ती एक दैवी योजना होती ज्याचं उद्दिष्ट धर्माची स्थापना करणं होतं.
advertisement
या सर्व कारणांच्या संयोजनामुळे महाभारताचे युद्ध केवळ 18 दिवसांत संपले. हे युद्ध आजही आपल्याला धर्म, न्याय आणि कर्तव्याचे धडे देतं.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : महाभारताचं युद्ध फक्त 18 दिवसांतच का संपलं? काय आहेत यामागील कारणं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement