advertisement

T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा थरार, कधी सुरू होणार स्पर्धा? बीसीसीआयकडून तारखांची घोषणा!

Last Updated:

7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे.

T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा थरार, कधी सुरू होणार स्पर्धा? बीसीसीआयकडून तारखांची घोषणा!
T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा थरार, कधी सुरू होणार स्पर्धा? बीसीसीआयकडून तारखांची घोषणा!
मुंबई : 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे. आयपीएल 2026 मार्च 2026 ला सुरू होईल तर स्पर्धेची फायनल 31 मे रोजी खेळवली जाईल. सोमवार 15 डिसेंबरला आयपीएल आणि फ्रॅन्चायजी यांच्यासोबत अबू धाबीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. स्पर्धेची सुरूवात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधून होईल का नाही? याबाबतचा सस्पेन्स मात्र अजून कायम आहे.
आयपीएलच्या 19 व्या मोसमाच्या तारखांची घोषणा आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांच्याकडून करण्यात आली आहे. मंगळवारी अबूधाबीमध्ये आयपीएल 2026 साठीचा लिलाव पार पडणार आहे, या लिलावाआधी आयपीएल आणि टीमच्या मालकांची बैठक पार पडली. आयपीएलच्या नियमांनुसार स्पर्धेची पहिली मॅच गतविजेती टीम खेळते, पण आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मॅच होणार का नाही? याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
advertisement

मंगळवारी आयपीएल लिलाव

आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवार 16 डिसेंबरला होणार आहे. या लिलावासाठी 369 खेळाडूंनी त्यांची नावं नोंदवली आहेत, यातल्या जास्तीत जास्त 77 खेळाडूंवर बोली लागणार आहे. सर्व 10 फ्रॅन्चायजींनी त्यांच्या 25 खेळाडूंचा कोटा पूर्ण केला तरच 77 खेळाडूंवर बोली लागेल.
दुसरीकडे बीसीसीआयने सर्व फ्रॅन्चायजींना आयपीएल 2026 साठी सगळे परदेशी खेळाडू पूर्ण मोसमासाठी उपलब्ध असतील, असं स्पष्ट केलं आहे. बांगलादेशचे खेळाडू संपूर्ण आयपीएल खेळतील का नाही? याबाबत साशंकता होती, कारण एप्रिल महिन्यात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय मॅच होत्या. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात जॉश इंग्लिस, एश्टन अगर, विलियम सदरलँड, एडम मिलने, राइली रुसो हे खेळाडू पूर्ण मोसम उपलब्ध नसतील, त्यामुळे त्यांच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कप संपताच IPL चा थरार, कधी सुरू होणार स्पर्धा? बीसीसीआयकडून तारखांची घोषणा!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement