पक्षाने बायकॉट केलं पण ठाकरेंच्या जवळच्या नेत्याला राहावलं नाही, भारताच्या विजयानंतर केलेली पोस्ट चर्चेत

Last Updated:

India Won Asia Cup Final Beat Pakistan: एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने एशिया कपमध्ये नवव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे.

News18
News18
India Won Asia Cup Final Beat Pakistan: एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने एशिया कपमध्ये नवव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अगदी राजकीय नेत्यांपासून, अभिनेते ते उद्योगपतींपर्यंत सर्वजण या खास विजयासाठी शुभेच्छा देत आहेत. पण शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहेत.
मिलिंद नार्वेकर यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत "हिंदुस्तान जिंदाबाद" असं लिहिलं आहे. या स्लोगनसोबत त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचा इमोजी देखील पोस्ट केला. एक भारतीय म्हणून त्यांच्या या पोस्टमध्ये काहीही वादग्रस्त किंवा वेगळेपण नाहीये. पण त्यांच्या पक्षाच्या अर्थात शिवसेना ठाकरे गटाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दलच्या भूमिकेची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. या हाय-व्होल्टेज सामन्याच्या काही दिवस आधी, शिवसेनेने (यूबीटी) पाकिस्तानसोबत सामना खेळायला विरोध केला होता. असा सामना होऊ नये, पाकिस्तानला बायकॉट करावं, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली होती.
advertisement
अशात भारताने हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा पराभव करताच ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं. एकीकडे पक्षाने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला विरोध केला असताना नार्वेकर यांनी भारताच्या विजयानंतर पोस्ट केली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची या सामन्याबद्दल नेमकी भूमिका काय आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
advertisement
"पंतप्रधान मोदी म्हणाले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे वाहू शकते? खेळ आणि युद्ध एकाच वेळी कसे होऊ शकते?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. "मोदींना देशभक्तीमध्ये रस नाही. त्यांना फक्त स्पर्धेतून मिळवलेल्या पैशात आणि व्यापारात रस आहे," अशी टीकाही ठाकरेंनी केली होती.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पक्षाने बायकॉट केलं पण ठाकरेंच्या जवळच्या नेत्याला राहावलं नाही, भारताच्या विजयानंतर केलेली पोस्ट चर्चेत
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement