T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्ड कपचा थरार, पाचही स्टेडियम ठरली, फायनल अहमदाबाद का मुंबईमध्ये होणार?

Last Updated:

भारतामध्ये फेब्रुवरी-मार्च महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्यासाठीच्या 5 स्टेडियमची नावंही समोर आली आहेत.

भारतात टी-20 वर्ल्ड कपचा थरार, पाचही स्टेडियम ठरली, फायनल अहमदाबाद का मुंबईमध्ये होणार?
भारतात टी-20 वर्ल्ड कपचा थरार, पाचही स्टेडियम ठरली, फायनल अहमदाबाद का मुंबईमध्ये होणार?
मुंबई : भारतामध्ये फेब्रुवरी-मार्च महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर करणार आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल, असं सांगण्यात येत आहे. भारतामधल्या पाच प्रमुख शहरांमध्ये स्पर्धा खेळवली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बऱ्याच ठिकाणी सामने खेळवले गेले, पण टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच मात्र ठराविक शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला आहे.

भारताच्या 5 शहरात वर्ल्ड कपच्या मॅच

बीसीसीआयच्या बैठकीत प्रत्येक स्टेडियममध्ये 6-6 मॅच खेळण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपचे सामने अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबईमध्ये होणार आहेत.

श्रीलंकेत 3 ठिकाणी होणार मॅच

टी-20 वर्ल्ड कप 2026 चं आयोजन भारतासोबत श्रीलंकेमध्येही होणार आहे. पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे त्यांचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जातील. पण श्रीलंकेत कोणत्या तीन ठिकाणी मॅच खेळवल्या जाणार, याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
advertisement

महिला वर्ल्ड कपच्या स्टेडियममध्ये मॅच नाही

नुकत्याच झालेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये ज्या स्टेडियमवर मॅच खेळवल्या गेल्या, तिकडे टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच खेळवल्या जाणार नाहीत. गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदूर आणि नवी मुंबईमध्ये महिला वर्ल्ड कपच्या मॅच खेळवल्या गेल्या होत्या. बंगळुरू आणि लखनऊमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच खेळवण्याबद्दल बीसीसीआयच्या बैठकीत चर्चा झाली का नाही? याबाबत काही स्पष्ट झालेलं नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्ड कपचा थरार, पाचही स्टेडियम ठरली, फायनल अहमदाबाद का मुंबईमध्ये होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement