MPs delegation : 'मी येणार नाही...', पाकिस्तानविरुद्ध बोलण्यास Yusuf pathan चा नकार, नेमकं काय आहे कारण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yusuf pathan will not joined MPs delegation : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध एकजूट दर्शवणं आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेसाठी प्रमुख जागतिक नेत्यांचा आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर जाणार आहे.
MPs delegation operation sindoor : भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर, भारत सरकारने सात सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांचे आयोजन केलं आहे. हे शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडणार आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध एकजूट दर्शवणं आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेसाठी प्रमुख जागतिक नेत्यांचा आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणं, हे या शिष्टमंडळाचं उद्दिष्ट असणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांतील 59 राजकीय नेते, खासदार आणि माजी मंत्र्यांचा तसेच 8 माजी राजदूतांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात एक मुस्लिम नेता आहे. मात्र, एका मुस्लिम नेत्याने शिष्टमंडळासोबत जाण्यास नकार दिलाय.
युसूफ पठाण परदेशी जाणार नाही
शिष्टमंडळासोबत जाण्यास नकार देणारा मुस्लिम नेता दुसरा तिसरा कुणी नसून स्टार क्रिकेटर आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाणचं नाव देखील सामील होतं. मात्र, आता युसूफ पठाण परदेशी जाणार नाही, अशी माहिती आली आहे. युसूफ पठाणने शिष्टमंडळात सामील होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
युसूफ पठाणशी संपर्क साधला पण...
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या गटात युसूफ पठाण यांचा समावेश केला जाणार नाही. भारत सरकारने थेट खासदार युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता. खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांचे नाव समाविष्ट करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसशी कोणताही सल्लामसलत झाली नव्हती. भारत सरकारने थेट युसूफ पठाणशी संपर्क साधला होता आणि आता पठाणने भारत सरकारला कळवले आहे की तो शिष्टमंडळासोबत परदेशात जाण्यास उपलब्ध असणार नाही.
advertisement
तृणमूल काँग्रेसने काय म्हटलं?
दरम्यान, युसूफ पठाणने परदेशी दौऱ्यात जाण्यास नकार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. तृणमूल काँग्रेसने पुन्हा सरकारच्या पदरात चेंडू टाकला आहे.
Location :
Delhi
First Published :
May 19, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MPs delegation : 'मी येणार नाही...', पाकिस्तानविरुद्ध बोलण्यास Yusuf pathan चा नकार, नेमकं काय आहे कारण?