मिरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पाहा नेमका पालिकेचा मास्टर प्लान
Last Updated:
Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील अनियंत्रित पार्किंग कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात रस्त्यांवर बेकायदा उभ्या असणाऱ्या खाजगी बसमुळे विविध भागात वाहतूक कोंडी होते. यासाठी मुंबई महापालिकेच्या पद्धतीवर एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
ट्रॅफिक जॅमची झंझट संपणार
मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. शिवाय शहरात अनेक ट्रॅव्हल कंपन्या आहेत ज्यांच्या प्रवासी वाहतुकीच्याही बस रस्त्यावरच ठिक-ठिकाणी उभ्या केल्या जातात. शहरात आधीच वाहनांची गर्दी वाढत आहे त्या असलेले अरुंद रस्ते आहेत.
पालिकेचा मेगा प्लॅन कोणता?
शहरात अशा पद्धतीने खाजगी बससे रस्त्याच्या कडेला उभ्या असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत. या बसेसवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. पण गाड्या पार्किंगसाठी पर्याय नसल्याने त्या रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे मुंबई महापालिकेसारख्याच पद्धतीने शहरात खासगी बससाठी वाहनतळ तयार केले जाणार आहेत.
advertisement
पार्किंगसाठी महत्त्वाच्या जागांचा शोध सुरू
शहरातील खाजगी जमीनमालकांना त्यांच्या मोकळ्या जमिनी या वाहनतळासाठी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन पालिका करणार आहे. या मोकळ्या जागेत बस उभ्या करण्यासाठी आवश्यक असलेले शुक्ल जमीन मालकच घेणार आहे. परंतू अजूनही शुल्क किती असावे याचा निर्णय महापालिका घेणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 12:16 PM IST








