पुणे : चिकाटी, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य राहत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे मूळचा बीड जिल्हा येथील विलास नलभे. MPSC परीक्षेचा अभ्यास अर्धवट सोडून, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत विलासने आज पुण्यात पांढऱ्या पोह्यांचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. अवघ्या काही वर्षांत तीन दुकाने, स्थिर उत्पन्न आणि स्वतःची ओळख हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो.



