मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली होती. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी स्वत: आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र ऐनवेळी नगरसेवक फुटू शकतात, अशी भीती कदाचित ठाकरेंना असावी, म्हणूनच त्यांनी उमेदवार देण्याची रिस्क घेतली नाही.त्यांनी उमेदवार दिला असता तर ते स्वत:चं उघडे पडण्याची शक्यता अधिक होती, अशा स्थितीत त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची प्रमाणे भूमिका घेतली आहे.



