सोलापूरातील उजनी धरणाच्या पाण्याची मँगनीज पातळी धोक्याच्या रेषेपेक्षा 51 पट जास्त आढळली आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.12 लाख सोलापूरकर या पाण्यावर अवलंबून आहेत.त्यामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळ आणि आरोग्य मंडळाला नोटीसा बजावल्या आहेत.त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धरणात पुण्यातून हजारो दशलक्ष लीटर सांडपाणी सोडले जात असल्याची कबुली देखील मिळाली आहे. त्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढला आहे.



