मुंबई : शेतीत खत देताना पाण्याचे योग्य प्रमाण काय असावे हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून तो बराचसा दुर्लक्षित राहतो. जास्त उत्पादन मिळावे म्हणून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत टाकतात, पण त्यासोबत पाण्याचे योग्य प्रमाण राखले नाही तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होते. रासायनिक, सेंद्रिय, द्रवरूप किंवा पाण्यात विरघळणारे खत असो, खत किती टाकायचे हे महत्त्वाचे नसून ते किती पाण्यात द्यायचे हे सर्वात निर्णायक ठरते. योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश तसेच मायक्रोन्यूट्रिएंट्स यांची कार्यक्षमता तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढू शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे
Last Updated: November 20, 2025, 14:31 IST