जालना: सध्याच्या धकाधकीच्या काळात आरोग्याबाबत प्रत्येक जण सजग झाला आहे. उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. त्यामुळे आहाराबाबतही विशेष काळजी घेतली जाते. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि पोषक पदार्थांचा समावेश केला जातो. आयुर्वेदात आरोग्यदायी रस म्हणून गव्हांकुर रसाचे महत्त्व सांगितले आहे. गव्हांकुर रसाला हिरवे रक्त म्हणून देखील ओळखले जाते. हा गव्हांकुर रस बनवायचा कसा? आणि त्याचे आरोग्यासाठी महत्त्व काय आहे? याबाबत जालना येथील आहारतज्ज्ञ गीता कोल्हे यांनी माहिती दिलीय.
Last Updated: November 07, 2025, 19:01 IST