उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे नेते बाळासाहेब सरवदे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली, ज्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अशातच आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे. त्यांनी एक दिवस प्रचार सोडून इकडे यावं.मी त्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. असंही अमित ठाकरे यांनी म्हंटले आहे.



