सातारा: एकेकाळी मराठ्यांच्या राजधानीचं शहर असलेल्या साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. काही काळ अजिंक्यतारा किल्ला हे राजधानीचं ठिकाण होतं. हा किल्ला सात टेकड्यांनी वेढलेला आहे. यातीलच एक टेकडी सातारा शहराचं मध्यवर्ती ठिकाण असून चार भिंती परिसर म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या येथे चार भिंती हुतात्मा स्मारक आहे. या ठिकाणचाही मोठा इतिहास आहे. याबाबत इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी माहिती दिलीय.



