बापरे! पृथ्वीचा अक्ष सरकला, फिरण्याचा वेग बदलला, वेळेवरही परिणाम; आता काय घडणार?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Earth rotation speed : अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पृथ्वीबाबत धक्कादायक शोध लावला आहे. पृथ्वीचा अक्ष अंदाजे 2 सेंटीमीटरने हलला आहे. शिवाय पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमध्ये थोडासा बदलदेखील नोंदवला गेला आहे.
नवी दिल्ली : पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे आपणा सगळ्यांना माहितीच आहे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतो. आता मात्र पृथ्वीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. पृथ्वीचा अक्ष सरकला आहे आणि तिची फिरण्याची गतीही कमी झाली आहे. त्यामुळे आता काय घडणार, कोणतं संकट येणार अशी भीती वाटू लागली आहे.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पृथ्वीबाबत धक्कादायक शोध लावला आहे. पृथ्वीचा अक्ष अंदाजे 2 सेंटीमीटरने हलला आहे. शिवाय पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमध्ये थोडासा बदलदेखील नोंदवला गेला आहे. धरणात साठलेल्या प्रचंड पाण्यामुळे हे घडलं आहे. चीनच्या थ्री गॉर्जेस धरणाचं हे पाणी. हा जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प मानला जातो.
धरणाचा पृथ्वीच्या गतीवर परिणाम कसा?
थ्री गॉर्जेस धरण यिचांग शहराजवळील हुबेई प्रांतातील सँडूपिंग इथं आहे. यांग्त्झी नदीवरील जे ऊर्जा उत्पादन, पूर नियंत्रण आणि नेव्हिगेशन सुधारणांसाठी बांधलं गेलं आहे. याचं बांधकाम 1994 मध्ये सुरू झालं आणि 2012 मध्ये पूर्णपणे कार्यरत झालं. या धरणात इतकं पाणी साठू शकतं की ते एकट्याने 22500 मेगावॅटपेक्षा जास्त वीज निर्माण करू शकतं. हे केवळ चीनच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करत नाही तर पूर नियंत्रण आणि नेव्हिगेशनमध्येही सुधारणा करतं.
advertisement
पण आता असं दिसून आलं आहे की त्याची शक्ती पृथ्वीसारख्या ग्रहाच्या भौतिक रचनेवर देखील परिणाम करण्यास सक्षम आहे. त्याच्या अभियांत्रिकीचं स्पष्टीकरण देण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक उपमा वापरली आहे, एक फिगर स्केटर तिचे हात पसरून हळूहळू फिरते आणि तिचे हात दुमडून वेगाने फिरते. त्याचप्रमाणे, जेव्हा वस्तुमान हलतं तेव्हा पृथ्वीच्या परिभ्रमण गतीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच दिवस लहान होत आहेत.
advertisement
नासाच्या मते थ्री गॉर्जेस धरण अब्जावधी टन पाणी साठवतं. जेव्हा हे पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरण्याऐवजी एकाच ठिकाणी जमा झालं तेव्हा त्याचं वस्तुमान वितरण बदललं. याचा परिणाम पृथ्वीच्या परिभ्रमणावर झाला. नासाचं म्हणणं आहे की पृथ्वीच्या परिभ्रमणातील बदलामुळे दिवस अंदाजे 0.06 मायक्रोसेकंदांनी कमी झाला आहे.
advertisement
शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की हा बदल सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात जाणवणार नाही, पण मानवी प्रकल्प ग्रहाच्या नैसर्गिक प्रणालींवर देखील परिणाम करू शकतात, हे यातून दिसून येतं. नासाने याला मानवनिर्मित संरचना पृथ्वीच्या गतिमानतेवर कसा परिणाम करू शकतात याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हटलं आहे.
पृथ्वी फिरणंच बंद झाली तर काय होईल?
लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवस अंदाजे 22 तासांचा होता. परंतु पृथ्वीची गती एक अब्ज वर्षांहून अधिक काळ मंदावली आहे, दिवस प्रत्येक शतकात सुमारे 2 मिलिसेकंदांनी वाढत आहेत. कोणत्याही बाह्य शक्तीशिवाय पृथ्वीचं फिरणं थांबवणं अशक्य आहे. परंतु जर पृथ्वी फिरणं थांबलं, तर वातावरण पृथ्वीच्या वेगाने फिरत राहिल. त्यामुळे झाडे आणि इमारतींसह पृष्ठभागावर स्थिर राहणाऱ्या गोष्टी जोरदार वाऱ्याने वाहू लागतील. पृथ्वीवर प्रत्येक भागावर सहा महिने सतत दिवस आणि सहा महिने अंधार असेल.
Location :
Delhi
First Published :
September 30, 2025 8:46 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बापरे! पृथ्वीचा अक्ष सरकला, फिरण्याचा वेग बदलला, वेळेवरही परिणाम; आता काय घडणार?