गंगेच्या काठावर मोडला अनेक वर्षांचा रेकॉर्ड! शास्त्रज्ञांना धक्का; म्हणाले, 'विश्वास कसा ठेवायचा?'

Last Updated:

गंगेची  सध्याची अवस्था पाहून शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, हे सर्व पाहिल्यानंतर परिस्थिती इतकी बिकट होत आहे यावर विश्वास ठेवता येत नाही.

गंगेची अवस्था पाहून शास्त्रज्ञ चिंतेत
गंगेची अवस्था पाहून शास्त्रज्ञ चिंतेत
वाराणसी : गंगा नदी पवित्र नदी मानली जाते. पण याच नदीची अवस्था इतकी वाईट झाली आहे की ती पाहून शास्त्रज्ञ धक्क्यात आहेत. गंगेनं आपला किनारा सोडला आहे. गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत यावेळी गंगा एक पातळी म्हणजे सुमारे 15 फूट खाली गेली आहे. परिस्थिती अशी आहे की, गंगेच्या मध्यभागासह गंगेच्या काठाचंही वाळूच्या किनाऱ्यात रूपांतर होत आहे. हे सर्व पाहिल्यानंतर परिस्थिती इतकी बिकट होत आहे यावर विश्वास ठेवता येत नाही, असं शास्त्रज्ञ म्हणाले.
गंगेच्या काँक्रीट घाटांवर वाळूचे ढिगारे साचू लागले आहेत. गंगेच्या वस्तीतील घाटांवर रेती आणि गाळ साचत असल्याचं प्रथमच दिसून आलं आहे. वाराणसीतील गंगेच्या 40 हून अधिक घाटांवर ही स्थिती निर्माण झाली आहे. सिंधिया घाट, सक्का घाट, ललिता घाट ते दशाश्वमेध घाट आणि पांडे घाटापासून शिवाळ्यापर्यंत वाळू आणि गाळ पोहोचला आहे. अस्सी घाट आधीच वाळू आणि मातीने व्यापलेला आहे. दशाश्वमेध घाटावर जास्तीत जास्त वाळू आणि माती जमा होते. इथं येणारे पर्यटक आणि भाविक घाटाच्या पायऱ्या उतरतात आणि वाळू, मातीवर उभे राहून फोटो काढतात.
advertisement
बोटींग करणाऱ्यांनाही रेती ओलांडून बोटीतून जावं लागतं. दशाश्वमेध घाटासमोर हिरवाईतून दीड किलोमीटर रुंद वाळू तयार झाली आहे. गाय घाट ते राजघाट दरम्यान 2 किलोमीटर रुंद वाळूचा खच निर्माण झाला आहे. घाटासमोर गंगेच्या मधोमध वाळूचे लांबलचक पट्टे निघाले आहेत. इथं पाण्याची उपलब्धता कमालीची घटली आहे. यानंतरची दृश्ये आणखीनच भयानक होत आहेत. वाळूमुळे परिस्थिती कोणत्या दिशेने चालली आहे हे स्पष्टपणे समजू शकते.
advertisement
गंगेच्या अशा अवस्थेचं कारण काय?
शास्त्रज्ञांच्या मते, याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे गंगेचा अखंड प्रवाह थांबवणं. धरणांमुळे गंगेच्या पाण्याचं नुकसान होत आहे. पहिली गोष्ट म्हणजे गंगा स्वच्छ करण्याचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. गंगा संशोधन केंद्र बीएचयूचे प्रा. डॉ. बी. डी त्रिपाठी म्हणाले की, एसटीपी प्लांट तयार झाला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधला गेला आहे आणि सर्व काही काम करत आहे, परंतु गंगेच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे. गंगेत पाणी नसल्याने नाल्यांमधील सांडपाणी त्यात पडत आहे; तेच इथलं प्रदूषण वाढवत आहेत.
advertisement
गंगा स्वच्छतेच्या सर्व योजना उद्ध्वस्त होतील
गेल्या दहा वर्षात सरकारने गंगा स्वच्छतेसाठी अनेक योजना राबवल्या, पण पाण्याची विक्रमी टंचाई सर्वच मेहनत वाया घालवत आहे, अशा परिस्थितीत जर अखंडित गंगा प्रवाहाची काळजी घेतली नाही तर या सर्व योजना अयशस्वी ठरतील, अशा परिस्थितीत सरकारला गंगा स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
गंगेच्या काठावर मोडला अनेक वर्षांचा रेकॉर्ड! शास्त्रज्ञांना धक्का; म्हणाले, 'विश्वास कसा ठेवायचा?'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement