गुड न्यूज! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १८७ कोटींची नुकसान भरपाई आली, हेक्टरी किती पैसे मिळणार?

Last Updated:

Agriculture News : गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली होती.

agriculture news
agriculture news
जळगाव : गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली होती. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान, शेतजमीन वाहून जाणे आणि आर्थिक अडचणीत सापडलेले हजारो शेतकरी अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘रब्बी’ हंगाम सावरण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून, त्याचा प्रत्यक्ष लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू लागला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतीवर मोठा आघात
गतवर्षीच्या मुसळधार पावसाने आणि पूरस्थितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेतातील माती खरडून गेली, तर काही भागांत उभे पीक अक्षरशः वाहून गेले. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रब्बी हंगामात तरी काही उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी धरली होती. मात्र आर्थिक संकटामुळे बियाणे, खते आणि मशागतीसाठी निधी उभारणे कठीण झाले होते.
advertisement
राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय
ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि त्यांची शेती पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत करणे.
२७० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध
या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५५ हजार ४८७ शेतकऱ्यांसाठी २७० कोटी ९२ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी १५ जानेवारीअखेरीस २ लाख ७१ हजार २७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट १८७ कोटी ४३ लाख ८ हजार ७४३ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
गुड न्यूज! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १८७ कोटींची नुकसान भरपाई आली, हेक्टरी किती पैसे मिळणार?
Next Article
advertisement
BMC Mayor Eknath Shinde:  न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला!
न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबई
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्ता वाटपावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र

  • मुंबईच्या महापौराबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने घडामोडींना वेग

  • शिंदे गट-भाजपच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.

View All
advertisement