ओसाड जमीन, डोक्यावर कर्जाचा डोंगर! पण या एका निर्णयाने देशमुख यांचं नशीब बदललं, आता करताय 2 कोटींची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्यासाठी शेतकरी सध्या नगदी पिकांकडे वळत आहेत. सुशिक्षित व्यक्तीही शेती करू लागले आहेत.
मुंबई : कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्यासाठी शेतकरी सध्या नगदी पिकांकडे वळत आहेत. सुशिक्षित व्यक्तीही शेतीत येऊ लागल्या आहेत. आजच्या आर्थिक जगात, बरेच लोक शेतीला उत्पन्नाचे साधन मानत नाहीत, परंतु आता अनेक तरुण शेतकरी शेतीतून भरीव नफा मिळवत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत जो शेतीतून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.
advertisement
वडिलांचं निधन, डोक्यावर कर्जाचा डोंगर
राहुल देशमुख असं या तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बदनूर गावातील रहिवाशी आहेत. राहुल देशमुख यांनी कठोर परिश्रम आणि नाविन्यपूर्ण तंत्रांनी केवळ 13 लाख रुपयांच्या कर्जातून मुक्तता केली नाही तर आता तो दरवर्षी 2 कोटी रुपये कमवत आहे. राहुलचे वडील शेतकरी होते आणि राहुल नोकरी करत होता. त्याला त्याच्या नोकरीत रस नव्हता आणि तो शेती करण्याचा विचार करत होता. त्यानंतर, राहुलच्या वडिलांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले. यामुळे राहुलवर दुःखाचा डोंगर कोसळला. हळूहळू तो कर्जाच्या सापळ्यात अडकला आणि त्याच्यावर सुमारे 13 लाख रुपयांचे कर्ज आले.
advertisement
हार मानली नाही
राहुलने परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही असा दृढनिश्चय केला. तो नगदी पिके घेण्याचा विचार करत होता. सुरुवातीला राहुलने लसूण आणि टोमॅटोची लागवड सुरू केली. ओसाड जमिनीवर पाण्याची टंचाई ही एक मोठी समस्या होती, परंतु राहुलने हार मानली नाही. त्याच्या कठोर परिश्रमामुळे ओसाड जमिनीतून त्याला सोने मिळायला लागले. राहुलने 2023 आणि 2024 मध्ये त्याच्या पहिल्या लसूण पिकातून अंदाजे 1 कोटी रुपये कमावले.
advertisement
2025 मध्ये टोमॅटोमधून त्याने अंदाजे 2.5 कोटी रुपये कमावले. ही रक्कम त्याच्यासाठी आशेचा किरण होती. त्यामुळे त्याचे कर्ज फेडणे सोपे झाले आणि त्याचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला.
advertisement
कोटींची उलाढाल, 45 लोकांना रोजगार
एकेकाळी कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या या शेतकऱ्याने आता त्याच्या कल्पकतेने आणि कठोर परिश्रमाने लाखो रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. आज तो 45 लोकांना रोजगार देतो. एकेकाळी लोक ज्या जमिनीला ओसाड म्हणून टाळत होते ती आता शेकडो कुटुंबांसाठी उपजीविकेचे साधन बनली आहे. राहुलने त्याच्या व्यवसायातून हे सिद्ध केले की नियोजन आणि योग्य तंत्रज्ञानाचा आधार घेतल्यास शेतीतूनही कोट्यवधींचा नफा मिळू शकतो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 7:34 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
ओसाड जमीन, डोक्यावर कर्जाचा डोंगर! पण या एका निर्णयाने देशमुख यांचं नशीब बदललं, आता करताय 2 कोटींची कमाई


