advertisement

स्मरिकाने कॉर्पोरेट नोकरी सोडली, गावी आली अन् घेतला हा धाडसी निर्णय, आता वर्षाला करतेय १.५ कोटींची कमाई

Last Updated:

success story : सुरक्षित कॉर्पोरेट करिअर सोडून शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेत स्मरिकाने मेहनत, नियोजन आणि आधुनिक विचारांच्या जोरावर शेतीला कोट्यवधींच्या व्यवसायात रूपांतरित केले आहे. आज ती अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

success story
success story
मुंबई : “कोणतेही काम लहान नसते, तर त्यामागील मेहनत आणि दृष्टी महत्त्वाची असते,” हे वाक्य छत्तीसगडच्या स्मरिका चंद्राकर यांच्या यशोगाथेला अगदी समर्पक ठरते. सुरक्षित कॉर्पोरेट करिअर सोडून शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेत स्मरिकाने मेहनत, नियोजन आणि आधुनिक विचारांच्या जोरावर शेतीला कोट्यवधींच्या व्यवसायात रूपांतरित केले आहे. आज ती अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
कॉर्पोरेट जगातून थेट शेतात
स्मरिका चंद्राकर ही मूळची छत्तीसगडमधील चार्मुडिया गावातील असून ती एका शेतकरी कुटुंबातून आली आहे. लहानपणापासूनच तिने वडील आणि आजोबांसोबत भातशेती करत शेतीचे धडे घेतले. पुढे शिक्षणासाठी ती रायपूरला गेली, जिथे तिने संगणक विज्ञान अभियांत्रिकी पूर्ण केले. त्यानंतर पुण्यात एमबीए करत तिने कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश केला. पुण्यातील एका नामांकित कंपनीत तिने व्यवसाय विकास कार्यकारी म्हणून पाच वर्षे काम केले.
advertisement
गावाची ओढ आणि शेतीकडे परतण्याचा निर्णय
उत्तम पगार आणि स्थिर आयुष्य असूनही स्मरिकाचे मन शेतीतच रमत होते. सुट्ट्यांच्या दिवशी ती हमखास गावाकडे येत असे आणि शेतात वेळ घालवत असे. या काळात शेती अधिक उत्पादनक्षम आणि नफ्याची कशी होईल, यावर कुटुंबासोबत सखोल चर्चा होत असे. हळूहळू शेतीला आधुनिक दृष्टिकोनातून पुढे नेण्याचा विचार पक्का झाला आणि अखेर तिने कॉर्पोरेट नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
advertisement
सुरुवातीचा संघर्ष आणि व्यवस्थापन कौशल्य
शेतीत उतरल्यानंतर सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पारंपरिक पद्धती बदलणे, बाजारभाव समजून घेणे, मजूर व्यवस्थापन आणि हवामानातील बदल यांचा सामना करावा लागला. मात्र एमबीए शिक्षणातून मिळालेल्या व्यवस्थापन कौशल्याचा तिने प्रभावी वापर केला. सर्वप्रथम तिने जमिनीच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले. शेणखत आणि गांडूळखताचा वापर करून मातीची सुपीकता वाढवली. त्यानंतर आधुनिक सिंचन व्यवस्था राबवून पाण्याचा योग्य वापर सुरू केला.
advertisement
भाजीपाला शेतीतून मोठे उत्पादन
या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसू लागले. पहिल्याच वर्षी स्मरिकाने प्रति एकर सुमारे ५० टन टोमॅटोचे उत्पादन घेतले. टोमॅटोसोबतच तिने भोपळा, काकडी आणि वांगी यांसारख्या भाज्यांची लागवड सुरू केली. भातशेती वर्षातून मर्यादित वेळा करता येते, मात्र भाजीपाला शेतीमुळे वर्षभर उत्पादन घेता येते आणि नियमित उत्पन्न मिळते, हे तिने ओळखले.
advertisement
कोट्यवधींची उलाढाल
आज स्मरिका सुमारे २० एकर क्षेत्रावर शेती करते आणि भविष्यात हे क्षेत्र आणखी वाढवण्याचा तिचा मानस आहे. तिच्या शेती व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे १.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे तिच्या शेतात सुमारे १२५ लोकांना रोजगार मिळतो, ज्यामुळे स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
स्मरिकाने कॉर्पोरेट नोकरी सोडली, गावी आली अन् घेतला हा धाडसी निर्णय, आता वर्षाला करतेय १.५ कोटींची कमाई
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement