TRENDING:

मिरचीचा 'तिखट' व्यवहार! रत्नागिरीत शेतकरी आणि ग्राहक हैराण, मात्र व्यापारी का होताहेत मालामाल?

Last Updated:

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामात मिरचीची लागवड फारशी होत नसल्यामुळे रत्नागिरीकर शेतकरी आणि ग्राहक दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असतात...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामात मिरचीची लागवड फारशी होत नसल्यामुळे रत्नागिरीकर शेतकरी आणि ग्राहक दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असतात. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथून रत्नागिरीच्या बाजारात मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या वाढलेल्या आवकेचा फायदा शेतकरी किंवा ग्राहकांना होताना दिसत नाहीये.
Ratnagiri News
Ratnagiri News
advertisement

व्यापारी मालामाल, शेतकरी आणि ग्राहक हैराण

घाऊक बाजारात शेतकऱ्यांकडून मिरची 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जात आहे, तर तीच मिरची किरकोळ बाजारात थेट 120 रुपये किलो दराने विकली जात आहे. म्हणजेच, दुप्पट दराने विक्री होत असून, यात शेतकरी आणि ग्राहक दोघेही होरपळत आहेत. मिरचीच्या या तिखट व्यवहारात फक्त व्यापारीच मालामाल होत आहेत.

advertisement

बाजारात कमी तिखट आणि जास्त तिखट अशा दोन प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असून, त्या 30 रुपये प्रति पाव किलो दराने विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे, आवक वाढली असूनही दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

'उत्पादन' खर्चापेक्षा कमी दर

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मिरचीचे उत्पादन चांगले झाले आहे. पण जास्त पावसामुळे मिरची जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात मिरची विकावी लागत आहे. मिरचीचे उत्पादन, खत, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च पाहता, शेतकऱ्यांना मिळणारा दर खूप कमी आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. एकूणच, वाढलेल्या उत्पादनामुळे मिरचीच्या दरात घसरण अपेक्षित होती, पण बाजारातील दलालांमुळे भाव वाढले असून, याचा फटका शेतकरी आणि ग्राहकांना बसत आहे.

advertisement

हे ही वाचा : कृषी हवामान : पाऊस शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणार! या जिल्ह्यांना IMD चा इशारा, काय काळजी घ्याल?

हे ही वाचा : कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार सोयीचा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, 20 विशेष फेऱ्या जाहीर, जाणून घ्या थांबे आणि वेळ 

मराठी बातम्या/कृषी/
मिरचीचा 'तिखट' व्यवहार! रत्नागिरीत शेतकरी आणि ग्राहक हैराण, मात्र व्यापारी का होताहेत मालामाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल