शेळके यांनी चार एकर क्षेत्रात द्राक्षबाग लावली होती. यासाठी त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. बेदाणे उत्पादनासाठी द्राक्षांची तोडणी करून शेतातील मोकळ्या शेडमध्ये ठेवली होती. दररोज चांगला सूर्यप्रकाश मिळत असल्याने बेदाणे तयार होण्याची प्रक्रिया चांगली चालू होती. मात्र, मंगळवारी पहाटे अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेडवर प्लास्टिक पेपर टाकता आला नाही. परिणामी, द्राक्ष भिजून नासावले. शेळके यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन बागेचे जतन केले होते, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
advertisement
अचानक आकाशातून परदेशी पाहुणा आला गावात, पुण्यातील भोरमध्ये उडाली खळबळ, नेमकं काय घडलं? Video
या नुकसानीमुळे शेळके यांच्यासह परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला असून, सरकारी मदतीची अपेक्षा आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाईची तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.





