अमरावतीमधील काजळी येथील सधन शेतकरी मयुर देशमुख यांनी अद्रक उत्पादनाबाबत लोकल 18 सोबत चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, सरकार फक्त शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. यावर्षी अद्रक उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे. कारण लागवड खर्च हा अर्धा एकर शेतीला 1 लाख रुपये येतो. अद्रकाला भाव आहे 30 रुपये किलो. याचा हिशोब काढला तर माझ्या उत्पादनानुसार फक्त 50 हजार रुपये हाती येईल. इतके नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.
advertisement
एकदाच केली लागवड अन् मिळवतोय 25 वर्ष उत्पन्न, शेतकऱ्याने नेमकं केलं काय?
अद्रकच नाही तर शेतकऱ्याच्या कोणत्याच भाजीपाल्याला भाव नाही. काही पिकं ही ऑप्शन म्हणून सुद्धा असतात. एका पिकात तोटा झाला तर तो दुसऱ्या पिकांत भरून निघेल. पण, यावर्षी शेतमालाला भाव नसल्याने आमचे सर्व उपाय हे हरलेले आहे. शासन शेतकऱ्याला खोटी आशा देतात. कर्जमाफी देणार म्हणून सांगितलं होतं पण अजूनही त्याबाबत काहीच माहिती आलेली नाही. शेतकऱ्यांनी नेमकं करावं तरी काय? हा प्रश्न आता सर्व शेतकऱ्याला पडला आहे.
पावसाळा सुरू झाला की, आम्हाला आणखी जमिनी तयार कराव्या लागतात. त्याला सुद्धा खर्च हा येणारच आहे. तो आणायचा कुठून? अद्रक हे पिकं चांगला नफा मिळवून देणारं पिकं आहे. त्यामुळे लागवड केली होती. पण, यावर्षी त्यातही निराशा आली. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करणं कधी बंद करणार? की शेतकरी दरवर्षी काही न काही धक्का खावून असाच हतबल होणार? हा प्रश्न मला पडलेला आहे? असे मयुर देशमुख सांगतात.