TRENDING:

हापूस प्रेमींचा हिरमोड होणार, यंदा आंबा उन्हाळ्यात नाही, इतके महिने लांबणार,कारण काय?

Last Updated:

Agriculture News : कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा यंदा हवामान बदलाच्या संकटात सापडला आहे. ऋतु चक्रानुसार राज्यात ऑक्टोबरनंतर थंडी पडायला हवी होती, मात्र यंदा पावसाचा काळ लांबला आणि उशिरा थंडीची सुरुवात झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा यंदा हवामान बदलाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे यंदा आंबा प्रेमींना २ महिने उशिरा वाट पाहावी लागणार आहे. ऋतु चक्रानुसार राज्यात ऑक्टोबरनंतर थंडी पडायला हवी होती, मात्र यंदा पावसाचा काळ लांबला आणि उशिरा थंडीची सुरुवात झाली. त्यामुळे कलमांवर अपेक्षित मोहोर दिसून न आल्याने आंबा हंगाम एक ते दोन महिने उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदा हापूसचा हंगाम थेट पावसाळ्याच्या सुमारास म्हणजेच जून महिन्यापर्यंत लांबणार असल्याची माहिती आहे.
Agriculture News
Agriculture News
advertisement

दिवाळीत पहिल्या पेट्या मुंबईत

दरवर्षी दिवाळीच्या काळात देवगड, रत्नागिरी आणि आंबेंगाव परिसरातून काही प्रतीकात्मक पेट्या मुंबई बाजारात दाखल होतात. यावर्षी देखील देवगड भागातून काही मोजक्या पेट्या मुंबईत पोहोचल्या आहेत, मात्र व्यापाऱ्यांच्या मते हा केवळ प्रारंभिक सिग्नल आहे. हवामान स्थिर झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादन अपेक्षित नाही.

उत्पादनात घट होणार

राज्यात सुमारे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली असून, यापैकी तब्बल १.२५ लाख हेक्टर क्षेत्र कोकणात आहे. मागील काही वर्षांपासून हवामानातील बदल जसे की अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण, तापमानातील चढ-उतार याचा आंबा फुलोरा आणि फळधारणा या दोन्ही टप्प्यांवर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी, आंब्याचे उत्पादन घटते आहे आणि निर्यातही मर्यादित होत आहे.

advertisement

आंबा बागायतदारांची चिंता वाढली

गेल्यावर्षी फेब्रुवारीतच स्थानिक बाजारात आंबा येऊ लागला होता. मार्च २०२४ पर्यंत मुंबई आणि पुणे बाजारात ४० ते ५० हजार पेट्या दाखल झाल्या होत्या. त्या वेळी प्रति पेटी दर ३ ते ४ हजार रुपये इतका मिळाला होता. मात्र, यंदा थंडी उशिरा पडल्याने फुलोरा उशिरा येत आहे. त्यामुळे बागायतदारांना खर्च वाढण्याची व उत्पादन कमी होण्याची भीती आहे.

advertisement

सरकारकडून विमा संरक्षण

हवामान बदलामुळे शेतीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले म्हणाले, “हवामान बदलामुळे नुकसान होत असले तरी शेतकऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्यात आल्या आहेत. उत्पादन टिकवण्यासाठी खतं व औषध फवारणीचं नियोजन वेळेत करणं आवश्यक आहे. योग्य वेळी व्यवस्थापन झाल्यास यंदा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.”

advertisement

पुढचा काळ आव्हानात्मक

हापूस आंब्याचे फळ बाजारात उशिरा येणार असल्याने व्यापार्‍यांसाठीही नियोजन कठीण होणार आहे. निर्यातदारांना शिपमेंटच्या तारखा बदलाव्या लागू शकतात. कोकणातील तापमानात स्थैर्य आल्यानंतरच आंब्याचा मोहोर आणि त्यानंतरची फळधारणा निश्चित होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, कमाई तर पाहा
सर्व पहा

एकूणच, कोकणातील आंबा हंगाम यंदा हवामानाच्या बदलामुळे आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. परंतु बागायतदारांनी पुढील दोन महिने फुलोरा आणि झाडांच्या निगेची काळजीपूर्वक काळजी घेतल्यास नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
हापूस प्रेमींचा हिरमोड होणार, यंदा आंबा उन्हाळ्यात नाही, इतके महिने लांबणार,कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल