TRENDING:

शेतात फवारणीची वेळ चुकवताय? थेट उत्पादनावर बसेल फटका, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकांच्या वाढीच्या ठराविक अवस्थेत आणि अनुकूल हवामानात फवारणी करणे आवश्यक असते. वेळेवर उपाय न केल्यास किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आणि त्याचा थेट फटका उत्पादनावर बसतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे
advertisement

फवारणी उशिरा झाल्यास किडींची संख्या नियंत्रणाबाहेर जाते. या किडी पानांवर, फुलांवर आणि फळांवर हल्ला करून पिकांचे मोठे नुकसान करतात. परिणामी पानांची प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रिया कमी होते, पिकांची वाढ खुंटते तसेच फुलगळ आणि फळगळ यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेक वेळा शेतकऱ्यांना रोग नियंत्रणासाठी अधिक तीव्र औषधांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे खर्च वाढतो.

Success Story: तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग! दोडका शेतीतून कमावतोय लाखोंचं उत्पन्न

advertisement

दुसरीकडे, वेळेआधी किंवा चुकीच्या टप्प्यावर फवारणी केल्यासही अपेक्षित परिणाम साधता येत नाही. पिकांना गरज नसताना केलेली फवारणी ही औषधांची नासाडी ठरते. विशेषतः दुपारच्या तीव्र उन्हात किंवा पावसाच्या आधी फवारणी केल्यास औषध झाडांवर टिकत नाही. त्यामुळे पिकांवर ताण येऊन पाने जळणे, फुले गळणे किंवा वाढ मंदावणे असे दुष्परिणाम दिसून येतात.

फवारणीची योग्य वेळ चुकल्याने उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ होते. अपेक्षित नियंत्रण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फवारणी करावी लागते. याचा थेट परिणाम नफ्यावर होतो. तसेच अयोग्य वेळेतील फवारणीमुळे जमिनीत आणि पर्यावरणात रासायनिक अवशेष वाढण्याची शक्यता निर्माण होते, जे दीर्घकालीन दृष्टीने घातक ठरू शकते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

कृषी विभाग आणि तज्ज्ञ शेतकऱ्यांना फवारणी करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, हवामान कोरडे आणि शांत असताना आणि पिकाच्या योग्य वाढीच्या अवस्थेत फवारणी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलेली फवारणी पिकांचे संरक्षण करते, उत्पादन वाढवते आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करून नफा वाढवण्यास मदत करते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
शेतात फवारणीची वेळ चुकवताय? थेट उत्पादनावर बसेल फटका, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल