TRENDING:

Hanuman Puja: हनुमानाची अत्यंत प्रभावशाली 12 नावे! बिकट काळातील जप भय अन् संकटांचा करतो नाश

Last Updated:

Hanuman Puja: हनुमानाच्या या नावांचा जप केल्यामुळे मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सुटका होते. आयुष्यात येणाऱ्या अडचणी, भीती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर तुम्हाला सतत कशाची तरी भीती वाटत असेल, तर या नावांचा आधार घेतल्यावर मन निर्भय होतं. कोणत्याही नवीन किंवा कठीण कामाची सुरुवात करताना ही नावं घेतल्यास कामातले अडथळे आपोआप दूर होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हनुमानाच्या 12 दिव्य नावांचा जप जो कोणी भक्त मनापासून आणि रोज सकाळ-संध्याकाळ करतो, त्याला आयुष्यात भरपूर यश मिळतं. त्याच्या मनातली भीती, अंगातले रोग आणि संकटांचा नाश होतो. हनुमान अशा भक्तांवर प्रसन्न होतो आणि त्यांना दीर्घायुष्य, धैर्य आणि आत्मविश्वासाचं वरदान देतो. जे भक्त हनुमानाच्या या 12 नावांचा 108 वेळा जप करतात, त्यांचं रक्षण स्वतः बजरंगबली दहाही दिशांनी करतो. अशा भक्तांना मानसिक शांतता मिळते आणि शत्रूंवर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो.
News18
News18
advertisement

हनुमानाच्या 12 दिव्य नावांची यादी

1. हनुमान

2. अंजनी सुत

3. वायुपुत्र

4. महाबल

5. रामेष्ट

6. फाल्गुण सखा

7. पिंगाक्ष

8. अमित विक्रम

9. उदधिक्रमण

10. सीता शोक विनायक

11. लक्ष्मण प्राण दाता

12. दशग्रीव दर्पहा

हनुमानाच्या या नावांचा जप केल्यामुळे मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सुटका होते. आयुष्यात येणाऱ्या अडचणी, भीती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर तुम्हाला सतत कशाची तरी भीती वाटत असेल, तर या नावांचा आधार घेतल्यावर मन निर्भय होतं. कोणत्याही नवीन किंवा कठीण कामाची सुरुवात करताना ही नावं घेतल्यास कामातले अडथळे आपोआप दूर होतात.

advertisement

100 वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण कधी? दिवसा अचानक 6 मिनिटे अंधार पडणार

आरोग्य आणि दीर्घायुष्य: या नावांच्या जपामुळे भक्ताला दीर्घायुष्याचं वरदान मिळतं. जे लोक आजारपणाने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी हा जप एखाद्या औषधासारखं काम करतो. हनुमान स्वतः अशा भक्तांचं दहाही दिशांनी रक्षण करतो, ज्यामुळे अपघातांपासून आणि अकाली संकटांपासून बचाव होतो. शरीरात एक वेगळीच चैतन्यशक्ती निर्माण होते.

advertisement

शक्ती आणि अफाट आत्मविश्वास: बजरंगबली हे शक्तीचे दैवत आहे. त्याच्या नावाच्या जपामुळे भक्ताचं धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक शक्तीमध्येही प्रचंड वाढ होते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा खेळाडूंसाठी हा जप एकाग्रता वाढवण्यास आणि जिद्द निर्माण करण्यास मदत करतो.

आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सुख - असं मानलं जातं की या नावांच्या जपामुळे पैशांच्या अडचणी दूर होतात. घरामध्ये सुख-समृद्धी वाढते आणि व्यवसायात किंवा नोकरीत यश मिळाल्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे. कुटुंबात जर काही कटकटी असतील, तर त्याही कमी होऊन गोडवा निर्माण होतो.

advertisement

सूर्याची मीन संक्रात! 15 मार्चनंतर नशिबाची डबल साथ या 6 राशींना मिळणार; भाग्योदय

मानसिक शांती आणि चिंतेतून मुक्ती: आजच्या धावपळीच्या जगात मानसिक ताण खूप वाढला आहे. या नावांच्या जपामुळे मनाला अफाट शांतता मिळते आणि विनाकारण वाटणाऱ्या चिंतांपासून मुक्ती मिळते. रात्री झोपण्यापूर्वी हा जप केल्यास वाईट स्वप्नं पडत नाहीत आणि शांत झोप लागते. मन प्रसन्न राहिल्यामुळे कामातही उत्साह टिकून राहतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

जप करण्याचे नियम आणि पद्धत - हनुमानाच्या या 12 नावांचा जप करण्यासाठी काही साधे नियम पाळणं गरजेचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर हनुमानाची विधीवत पूजा करावी. पूजेच्या वेळी किमान 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा या नावांचा मनापासून जप करावा.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Hanuman Puja: हनुमानाची अत्यंत प्रभावशाली 12 नावे! बिकट काळातील जप भय अन् संकटांचा करतो नाश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल