द्रिक पंचांगनुसार, या वेळी भाऊबीजेला राहु काळाची अशुभ छाया राहणार आहे. राहु काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही. भाऊबीजेला राहु काळाची वेळ काय असेल आणि भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त काय असेल, त्याविषयी जाणून घेऊया.
राहु काळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत राहील?
यावेळी भाऊबीजेवर राहु काळाचा प्रभाव राहणार आहे. द्रिक पंचांगनुसार, राहु काळ २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि २ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होईल. या काळात भावाला औक्षण-टिळा लावणं टाळावं.
advertisement
भाऊबीजेचे शुभ मुहूर्त -
पहिला मुहूर्त दुपारी १ वाजून १३ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.
अभिजीत मुहूर्त असेल, सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.
विजय मुहूर्त असेल, दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.
गोधुली मुहूर्त असेल, ज्याची वेळ संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजून ०९ मिनिटांपर्यंत असेल.
भावाला औक्षण-टिळा कसा लावावा -
या दिवशी भावाने सकाळी स्नान करावे. आपल्या बहिणीच्या घरी जावे आणि तिथे बहिणीच्या हातचे भोजन ग्रहण करावे. यानंतर बहिणी भावाला भोजन करवून, त्यानंतर औक्षण करावे. भावानं आपल्या शक्तीनुसार बहिणीला भेटवस्तू द्यावी.
भाऊबीजेचे उपाय -
टिळा लावताना बहिणीने भावाच्या कपाळावर चंदन किंवा केशरचा टिळा लावल्यास त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
या दिवशी टिळा लावताना यमदेवासाठी दिवा (दीपक) देखील लावावा, ज्यामुळे अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
