सामान्यतः सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र म्हणून ओळखले जात असले तरी दोघांमध्ये शत्रुत्वाचे नाते असल्याचे ज्योतिषात म्हटले जाते. परंतु या वेळी मीन राशीत शनी वक्री गतीत असल्याने आणि सूर्य वृश्चिकेत प्रवेश करणार असल्याने, कर्क, वृश्चिक आणि मकर राशींवर या संयोगाचा विशेष परिणाम दिसून येईल.
नवपंचम राजयोग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानुसार, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२३ वाजता सूर्य आणि शनी एकमेकांपासून १० अंशांवर असतील. या स्थितीत निर्माण होणारा “नवपंचम राजयोग” अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या योगामुळे काही राशींच्या लोकांना आत्मविश्वास, आर्थिक लाभ, आणि करिअरमध्ये प्रगती मिळू शकते.
advertisement
कर्क राशी
या राशीसाठी नवपंचम राजयोग अतिशय फायदेशीर ठरेल. मीन राशीत वक्री शनी आणि वृश्चिक राशीत सूर्य असल्याने, कर्क राशीच्या लोकांच्या नशिबात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील, वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल, आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा बोनस मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा असेल. आर्थिक स्थैर्य वाढेल आणि बचत करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा वाढेल आणि आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक राशी
या राशीत सूर्य स्वतः प्रवेश करत असल्यामुळे हा काळ अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी असेल. मेहनतीतून लाभ मिळेल, आणि व्यवसायिकांना मोठा नफा किंवा नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडतील आणि कामाचे कौतुक होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल. वैवाहिक जीवनात समरसता वाढेल, तर आरोग्यही चांगले राहील.
मकर राशी
शनी आणि सूर्याचा नवपंचम राजयोग या राशीसाठीही शुभ ठरेल. या काळात सूर्य अकराव्या घरात आणि शनी दुसऱ्या घरात असेल, ज्यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आणि वातावरण आनंदी बनेल. नोकरीत मेहनतीचं फळ मिळेल, तसेच वडिलोपार्जित व्यवसायातून मोठा नफा होऊ शकतो. काहींना अनपेक्षित यश किंवा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे.
(सदर बातमी फक्त महितीकरीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
