ब्रह्म मुहूर्त - सकाळी 5:29 ते 06:05
सर्वात शुभ काळ - सकाळी 06:06 ते 08:20
विजय काळ - सकाळी 10:47 ते 11:58
अभिजित मुहूर्त - सकाळी 11:59 ते दुपारी 12:53
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची पद्धत -
ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांच्या मते, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी औक्षण ताट तयार करणे आवश्यक आहे. या ताटात राखी, अक्षता, मिठाई आणि दिवा असल्याची खात्री करा. औक्षण ताट आधी इष्टदेवाला समर्पित करून त्यांची पूजा करा. यानंतर, ताटात ठेवलेली पहिली राखी श्री गणेशाला अर्पण करा. नंतर भावाला पूर्वेकडे तोंड करून राखी बांधण्यासाठी बसवावे. तसेच भाऊ आणि बहीण दोघांनीही स्वच्छ कापडाने आपले डोके झाकावे.
advertisement
95 वर्षांनी रक्षाबंधन दिवशी असा शुभ संयोग; नारळी पौर्णिमा 2 दिवस असल्यानं..
राखी बांधताना तीन गाठी बांधण्याचे महत्त्व -
राखी बांधताना भावाच्या कपाळावर टिळा लावा, थोडे तांदूळ शिंपडा आणि नंतर राखी बांधा. राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. ही परंपरा भावाच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीशी संबंधित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम भावाला राखी बांधावी आणि नंतर सगळ्या जेवावे. तसेच, या दिवशी गरजू व्यक्तीला दान देणे देखील खूप पुण्यपूर्ण मानले जाते.
जेवणापूर्वी की जेवणानंतर? घरी आलेल्या भावाला कधी राखी बांधणे योग्य ठरेल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
