शंभू शंकराने या दिवशी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता, म्हणूनच या त्रिपुरा पौर्णिमा असे नाव देण्यात आले. शिवाय, हा दिवस भगवान विष्णूंच्या मत्स्य अवताराच्या प्रकटीकरणासाठी एक शुभ प्रसंग मानला जातो. ज्योतिषांच्या मते, या दिवशी काही चुका टाळल्या पाहिजेत, कारण त्यामुळे श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद मिळू शकत नाहीत.
तामसिक अन्न - कार्तिक पौर्णिमेला, चुकूनही मांस, मद्य, कांदे, लसूण इत्यादी तामसिक अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळावे. या दिवशी या पदार्थांचे सेवन करणे खूप अशुभ मानले जाते.
advertisement
सकाळी उशिरा झोपू नका - कार्तिक पौर्णिमेला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून देवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. उशिरा उठल्याने दिवसाचे शुभ परिणाम कमी होतात.
राग किंवा वाद टाळा - कार्तिक पौर्णिमेला मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. या दिवशी कोणाशीही भांडणे किंवा गैरवर्तन केल्याने पूजेचे फायदे कमी होतात.
तुळशीची पानं तोडू नका - कार्तिक पौर्णिमेला, चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. असे केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला क्रोध येतो. कार्तिक पौर्णिमेला तुळशीमातेची पूजा केली जाते.
तो दिवस दूर नाही! याच महिन्यात शनि मार्गी झाल्याचा तुमच्या राशीवर असा प्रभाव
दिवा लावा - कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी देव दिवाळीचा सण देखील साजरा केला जातो. म्हणून, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या नावाने दिवा लावा. त्यानं नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
दान करा - कार्तिक पौर्णिमेला, कोणालाही तुमच्या दारातून रिकाम्या हातानं परत पाठवू नका किंवा गरिबांचा अपमान करू नका. असं केल्यानं भगवान शिव, विष्णू आणि देवी लक्ष्मी देखील क्रोधित होतात.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
