नुकतेच अल्पसंख्याक विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. या वसतिगृहांतील प्रवेशासाठीचे निकष 2013 आणि 2021 मध्ये निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहात बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर वसतिगृहातील जागा रिक्त राहिल्यास त्या जागांवर दहावी ते बारावी, पदविका, पदविका समकक्ष, आयटीआय, तंत्रनिकेतन संस्थांतील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थिनींकडून 2013 आणि 2014 मध्ये निश्चित केलेले शुल्क आकारण्यात येणार आहे.
advertisement
आठवीत असताना आई-वडिलांचं निधन, 50 रुपयांसाठी 12 तास काम, आता महिन्याची कमाई 2 लाख!
दरम्यान, अल्पसंख्यांक विभागाच्या या निर्णयमाळे दहावी ते बारावी, पदविका, पदविका समकक्ष, आयटीआय, तंत्रनिकेतनचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा लाभ होणार आहे. तसेच अत्यंत अल्प शुल्कात राहण्याची सोय होणार असल्याने शिक्षण सुलभ होणार आहे. तर या सुविधेचा अधिकाधिक विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असं आवहन करण्यात आलंय.






