विद्यार्थिनीची केलेली हत्या
आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना आरोपीने विद्यार्थीनीची हत्या केली होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे समोर आली. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.
advertisement
Palghar Crime : प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं; प्रियकराकडून नात्याचा भयानक शेवट, पालघर हादरलं
अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला होता. अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला. मृत मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचं दुसऱ्या ठिकाणी लग्न जमलं होतं. यातून तिची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर आता आरोपीनेही गळफास घेतला आहे. मात्र, विद्यार्थिनीच्या झालेल्या या हत्येनंतर आश्रम शाळांमधील विद्यार्थिनी भीतीच्या छायेखाली आहेत.
