कोठाळा येथील ज्ञानेश्वर सुभाष गुळवणे (32) हे आपल्या कुटुंबासह कोठाळा खुर्द येथे राहतात. गावातील हनुमान मंदिरासमोर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. बुधवारी रात्री सुमारे 9 ते 11 वाजेदरम्यान त्यांचे संपूर्ण कुटुंब कीर्तनाला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. कीर्तनानंतर काही वेळाने त्यांची आई व मुले घरी आली. त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
advertisement
हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं
चोरट्यांनी ज्ञानेश्वर गुळवणे यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. चोरीची माहिती मिळताच, ज्ञानेश्वर गुळवणे यांनी देखील घराकडे धाव घेतली. बेडरूममध्ये कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी 4 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, जालना शहरातील गुन्हेगारीचे लोण ग्रामीण भागात देखील पसरत आहे. शेतातील विद्युत मोटारी, गोठ्यात बांधलेले जनावरे चोरून नेण्याच्या घटनांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.






