हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: सुखदेव वैद्य यांच्या मुलीचा विवाह 8 मार्च रोजी ठरला आहे. त्यामुळे ते पत्नीसह नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी जात होते.
जालना: सध्याच्या काळात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतेच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात एक दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये लाडक्या लेकीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी जात असलेल्या वडिलांचाच मृत्यू झाला, तर आई या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. ज्या घरात सनई-चौघडे वाजणार होते, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील वैद्य कुटुंबात लग्न सोहळ्याची लगबग होती. 8 मार्च रोजी सुखदेव वैद्य यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला होता. त्यामुळे ते आपल्या पत्नीसह नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी जालन्याकडे जात होते. याचवेळी बदनापूर येथील दुधना नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झाला.
advertisement
वैद्य यांच्या दुचाकीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सुखदेव यांचा जागीच मृत्यू झाला, तर वर्षा वैद्य या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांत रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढलेले अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन यामुळे रस्ते वाहतूक अनियंत्रित झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लेकीच्या लग्नाआधीच वडिलांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 12:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं










